शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अशिक्षित नागरिक देशावरील मोठे ओझे, केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 07:41 IST

Amit Shah News: अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली : अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा कोणती कर्तव्ये बजावायला सांगितली आहेत, याची अशिक्षित माणसाला काहीही कल्पना नसते. नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्याच्या घटनेस २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांची मुलाखत घेण्यात आली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी गुजरातमध्ये एक मोठी समस्या होती ती म्हणजे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण खूपच मोठे होते. त्यावेळी आम्ही शाळेत पटनोंदणी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जोमाने प्रयत्न केले. त्यानंतर शाळेत १०० टक्के पटनोंदणी करण्यात गुजरात सरकार यशस्वी झाले होते.अमित शहा यांनी सांगितले की, पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कारकिर्दीत राज्यातल्या शाळांत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. सध्या ज्या लोकशाही पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, तशा त्या याआधी कधीही झाल्या नव्हत्या, हे मोदी यांचे टीकाकारही मान्य करतील. मोदी हे हुकूमशहा आहेत, या टीकेत काहीही तथ्य नाही.  शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. ते प्रत्येकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात, मोदी शिस्तप्रिय आहेत. देशात परिवर्तन घडविण्यासाठी जनतेने  सत्ता दिली आहे. फक्त सरकार चालविण्यापुरते हे अधिकार आपल्याला दिलेले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे.  

राष्ट्रहितासाठी मोदी घेतात योग्य निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भाजपला आवडण्याची शक्यता नाही, असेही निर्णय घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. काळा पैसा खणून काढताना, आर्थिक सुधारणा करताना, करचुकवेगिरीचे सर्व मार्ग बंद करताना काही लोकांना त्रास हा होणारच. पण त्याचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रहितासाठी योग्य तोच निर्णय घेतात.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार