शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

लष्करासह लढणारे उपेक्षितच

By admin | Updated: April 10, 2016 02:15 IST

जम्मू-काश्मीरला विभागणाऱ्या पिरपंजाल पर्वतरांगाजवळचे हिलकाका हे उंच ठिकाण काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांचा अड्डा बनले होते. २००३मध्ये लष्कराने स्थानिकांच्या साहाय्याने ‘आॅपरेशन सर्पविनाश’

- संकेत सातोपे,  जम्मू

जम्मू-काश्मीरला विभागणाऱ्या पिरपंजाल पर्वतरांगाजवळचे हिलकाका हे उंच ठिकाण काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांचा अड्डा बनले होते. २००३मध्ये लष्कराने स्थानिकांच्या साहाय्याने ‘आॅपरेशन सर्पविनाश’ राबवून अतिरेक्यांना संपविले. मात्र या आॅपरेशनमध्ये भाग घेणारी गावे आजही उपेक्षित आहेत. गावापर्यंत रस्ता बांधून देण्याचे तत्कालीन सरकारने दिलेले आश्वासनही अजून पूर्ण केलेले नाही, असे स्थानिकांनी जम्मूच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगितले.‘आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता या आॅपरेशनमध्ये लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढलो, रक्त सांडलं, ते काही देशावर उपकार केले असं नाही. परंतु आम्हाला विकासाच्या मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी साध्या एका रस्त्याची मागणीही सरकारने १०-१२ वर्षांत पूर्ण केलेली नाही. केंद्रात - राज्यात सत्तांतरे झाली, परंतु आमची स्थिती जैसे थेच आहे,’ अशी कैफियत हिलकाकाच्या सर्वांत उंच टोकावर राहणाऱ्या मीर जमान यांनी पत्रकारांसमोर मांडली. ताहीर चौधरी यांनी सांगितले की, ‘तत्कालीन शासनाने आमच्या काही मुलांना सुरक्षा यंत्रणांच्या सेवेत घेतले, व्हिलेज डिफेन्स कमिटी स्थापन करून आम्हाला कायमस्वरूपी शस्त्रास्त्रे आणि नियमित दारूगोळाही पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, रस्ता बनविण्याचे काम मात्र अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे आमच्या मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येतात. आरोग्य आणि अन्य सेवा आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आम्ही हिंदुस्थान झिंदाबाद म्हणतो, फुटीरतेची भाषा कधीच करीत नाही. आमचे उपद्रव मूल्य नाही, म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष होतं. उलट काश्मीर खोऱ्यात काही लोक एका हातात मागणीपत्र आणि दुसऱ्या हातात फुटीरतेचे शस्त्र घेऊन उभे राहतात. त्यामुळे त्यांना सर्व अनुदाने मिळतात. हुरियतचे लोक आम्हाला फितवण्याचा प्रयत्न करत असतात.व्हिलेज डिफेन्सव्हिलेज डिफेन्स कमिटीच्या माध्यमातून गावकऱ्यांना शस्त्रास्त्रे देण्याच्या निर्णयाबाबत ‘नही तो ये लोग जी नही पायेंगे सरकार,’ असे उत्तर मिळाले. या गावातील प्रत्येकाला संरक्षण देणे लष्कराला शक्य नसल्यामुळे गावकऱ्यांना शस्त्र देण्यात आले आहे. मात्र ही शस्त्रास्त्रे देताना पूर्ण चौकशी केली जाते. त्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. या उपक्र माचा आतापर्यंत कोणताही दुष्परिणाम झालेला दिसत नाही, असे जम्मूतील सेनादलाचे जनसंपर्कअधिकारी लेफ्ट. कर्नल मनिष मेहता यांनी सांगितले.