शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

'...तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो, अब की बार भाजपा तडीपार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:52 IST

Uddhav Thackeray criticize Narendra Modi: जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. आम्ही जी लढाई लढतोय ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची लढाई आहे. भाजपाला घटना बदलण्यासाठीच ४०० पार जायचं आहे. मात्र जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की. या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं. संपूर्ण देशात यांचे दोनच खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. आता मलाही विचारतात की, तुमच्या किती जागा येतील? यांना विचारलं तर म्हणतात की ४०० पार, काय ४०० पार हे काय फर्निचरचं दुकान आहे. आज देशभरातील नेते इथे आले आहेत. आज जी परिस्थिती आहे, ती महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही जी लढाई लढतोय, ती लोकशाही आणि घटनेला वाचवण्यासाठीची आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत. तुम्हाला माहिती असेलच सध्या रशियामध्ये निवडणुका सुरू आहेत. पण तिथे व्लादिमीर पुतीन त्यांच्याविरोधात कुणीच लढणारा नाही. जे विरोधक आहेत ते तुरुंगात किंवा परदेशात आहेत. पण मी लोकशाही मानतो, निवडणूक घेतलीय, पण विरोधात लढायलाच कुणी नाही. हे अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर अशी वेळ आलीय की, मी म्हणतो देश हाच माझा धर्म, देश वाचला तर आम्ही वाचू, व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. व्यक्ती देशापेक्षा मोठं असता कामा नये. कुणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे. हे आता मोदी सरकार अशी जाहिरात करताहेत, यांच्या डोक्यात आता देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशातील जनतेसमोर हुकूमशाहा कितीही मोठा असला तरी जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो. मी एक घोषणा नेहमीच देत असतो ती म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हान दिलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४