शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

पाकिस्तानचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय कुरापती थांबणार नाहीत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 08:03 IST

जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत.

मुंबई - जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ''आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे.त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. '', असं म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?सीमेपलीकडून गोळीबार करणाऱ्या पाकड्या सैनिकांचा आपले जवान खात्मा करीत असले तरी पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होताना दिसत नाही. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आमच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याच्या आणि निरपराध्यांचे बळी घेण्याच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. मागील महिनाभरात हे वारंवार घडले आहे. सीमारेषेवरील आर. एस. पुरा सेक्टर, कठुआ, सांबा, अरनिया आदी भागांत गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. उखळी तोफांचाही मारा केला. त्यात आर. एस. पुरा सेक्टरमधील बचनोदेवी आणि सुनीलकुमार या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. वास्तविक बुधवारी रात्रीच आपल्या बीएसएफच्या जवानांनी तीन पाकड्या सैनिकांसह आठजणांचा खात्मा केला होता. त्याआधी सहा दहशतवादी आणि सात पाकिस्तानी जवानांना आपल्या लष्कराने ठार मारले होते. तरीही पाकड्यांच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. तिकडे ‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला संरक्षण द्यायचे. एवढेच नव्हे तर ‘क्लीन चिट’ द्यायची आणि हिंदुस्थानने दिलेले पुरावे कचऱ्याच्या डब्यात फेकायचे. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे. हिंदुस्थानी लष्कराच्या धडक कारवायांनाही भीक घालायची नाही. पाकिस्तानचा हा बेमुर्वतखोरपणा वर्षानुवर्षे सुरू आहे. अमेरिका आज दहशतवादावरून त्या देशाला इशारे वगैरे देत असली, आर्थिक मदत थांबविण्याच्या धमक्या देत असली तरी आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे. त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. वर्षभरात हिंदुस्थानी लष्कराने प्रतिकारवाईत १३८ पाकड्या सैनिकांचा खात्मा केला. तरीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमावर्ती गावांमधील निरपराध्यांचे बळी घेण्याची त्यांची खुमखुमी संपलेली नाही. त्यांचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय या कुरापती थांबणार नाहीत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmericaअमेरिका