शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पाकिस्तानचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय कुरापती थांबणार नाहीत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 08:03 IST

जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत.

मुंबई - जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ''आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे.त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. '', असं म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?सीमेपलीकडून गोळीबार करणाऱ्या पाकड्या सैनिकांचा आपले जवान खात्मा करीत असले तरी पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होताना दिसत नाही. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आमच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याच्या आणि निरपराध्यांचे बळी घेण्याच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. मागील महिनाभरात हे वारंवार घडले आहे. सीमारेषेवरील आर. एस. पुरा सेक्टर, कठुआ, सांबा, अरनिया आदी भागांत गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. उखळी तोफांचाही मारा केला. त्यात आर. एस. पुरा सेक्टरमधील बचनोदेवी आणि सुनीलकुमार या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. वास्तविक बुधवारी रात्रीच आपल्या बीएसएफच्या जवानांनी तीन पाकड्या सैनिकांसह आठजणांचा खात्मा केला होता. त्याआधी सहा दहशतवादी आणि सात पाकिस्तानी जवानांना आपल्या लष्कराने ठार मारले होते. तरीही पाकड्यांच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. तिकडे ‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला संरक्षण द्यायचे. एवढेच नव्हे तर ‘क्लीन चिट’ द्यायची आणि हिंदुस्थानने दिलेले पुरावे कचऱ्याच्या डब्यात फेकायचे. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे. हिंदुस्थानी लष्कराच्या धडक कारवायांनाही भीक घालायची नाही. पाकिस्तानचा हा बेमुर्वतखोरपणा वर्षानुवर्षे सुरू आहे. अमेरिका आज दहशतवादावरून त्या देशाला इशारे वगैरे देत असली, आर्थिक मदत थांबविण्याच्या धमक्या देत असली तरी आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे. त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. वर्षभरात हिंदुस्थानी लष्कराने प्रतिकारवाईत १३८ पाकड्या सैनिकांचा खात्मा केला. तरीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमावर्ती गावांमधील निरपराध्यांचे बळी घेण्याची त्यांची खुमखुमी संपलेली नाही. त्यांचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय या कुरापती थांबणार नाहीत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmericaअमेरिका