शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय कुरापती थांबणार नाहीत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 08:03 IST

जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत.

मुंबई - जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी ( 19 जानेवारी ) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ''आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे.त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. '', असं म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?सीमेपलीकडून गोळीबार करणाऱ्या पाकड्या सैनिकांचा आपले जवान खात्मा करीत असले तरी पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ होताना दिसत नाही. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आमच्या नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याच्या आणि निरपराध्यांचे बळी घेण्याच्या त्यांच्या कुरापती सुरूच आहेत. मागील महिनाभरात हे वारंवार घडले आहे. सीमारेषेवरील आर. एस. पुरा सेक्टर, कठुआ, सांबा, अरनिया आदी भागांत गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. उखळी तोफांचाही मारा केला. त्यात आर. एस. पुरा सेक्टरमधील बचनोदेवी आणि सुनीलकुमार या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. वास्तविक बुधवारी रात्रीच आपल्या बीएसएफच्या जवानांनी तीन पाकड्या सैनिकांसह आठजणांचा खात्मा केला होता. त्याआधी सहा दहशतवादी आणि सात पाकिस्तानी जवानांना आपल्या लष्कराने ठार मारले होते. तरीही पाकड्यांच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. तिकडे ‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला संरक्षण द्यायचे. एवढेच नव्हे तर ‘क्लीन चिट’ द्यायची आणि हिंदुस्थानने दिलेले पुरावे कचऱ्याच्या डब्यात फेकायचे. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे. हिंदुस्थानी लष्कराच्या धडक कारवायांनाही भीक घालायची नाही. पाकिस्तानचा हा बेमुर्वतखोरपणा वर्षानुवर्षे सुरू आहे. अमेरिका आज दहशतवादावरून त्या देशाला इशारे वगैरे देत असली, आर्थिक मदत थांबविण्याच्या धमक्या देत असली तरी आज जो पाकिस्तान नावाचा ‘दहशतवादी भस्मासुर’ थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे. त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवीत आहे. वर्षभरात हिंदुस्थानी लष्कराने प्रतिकारवाईत १३८ पाकड्या सैनिकांचा खात्मा केला. तरीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमावर्ती गावांमधील निरपराध्यांचे बळी घेण्याची त्यांची खुमखुमी संपलेली नाही. त्यांचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय या कुरापती थांबणार नाहीत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmericaअमेरिका