शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

क्रिकेट सामन्यामुळे झाली दोन ट्रेनमध्ये टक्कर, त्या रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर, रेल्वेमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 8:46 AM

Indian Railway Accident: आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यातील कंटाकापल्ली येथे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यातील कंटाकापल्ली येथे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी शनिवारी सांगितले की, या रेल्वे गाड्यांची जेव्हा टक्कर झाली, त्यावेळी एका ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातांमागील कारणं अधोरेखित करताना ही माहिती दिली. 

२९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता हावडा-चेन्नई मार्गावर रायगडा ट्रेनने विशाखापट्टणम-पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. 

रेल्वेमंत्र्यांनी नव्या सुरक्षा उपायांबाबत माहिती देताना आंध्र प्रदेशमधील या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला. तसेच असे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये लोको पायलट आणि सह लोको पायलट यांचं लक्ष क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाल्याने हा अपघात घडला होता. आता आम्ही अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, जी अशा परिस्थितीची त्वरित माहिती घेईल. त्यामुळे पायलट आणि सहाय्यक पायलट यांचं संपूर्ण लक्ष ट्रेन चालवण्यावर एकाग्र राहील. ते पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षेवर आपलं लक्ष केंद्रित करणं कायम ठेवणार आहोत. आम्ही प्रत्येक घटनेचं मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यावर तोडगा काढतो.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेच्या एका दिवसानंतर प्राथमिक रेल्वे तपासामधून या अपघातासाठी रायगडा ट्रेनचा लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट जबाबदार असल्याचे समोर आले. त्यांनी खराब स्वचलित सिग्नल प्रणालीसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केलं. या अपघातामध्ये चालक दलाचा दोन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव