शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:24 IST

भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले...

सध्या संपूर्ण देशभरात हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू आहे. यातच, कँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सोमवारी मोठे विधान केले. द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असे अय्यर यांनी म्हटले आहे. 

एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले. "देशात द्वेष पसरवला जातोय" -काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदीच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने राहावे, प्रत्येकाने एकमेकांसोबत शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतीयांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश आहे आणि येथे सर्वजण सोबत राहतात.

"राजीव गांधी दोन वेळा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना..." -काही दिवसांपूर्वी, राजीव गांधी यांच्या पात्रतेसंदर्भात मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "राजीव गांधी एक वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणे तसे कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. अशा व्यक्तीला भारताचे पंतप्रधान कसे काय बनवले गेले," असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसHinduismहिंदुइझमMuslimमुस्लीम