शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:24 IST

भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले...

सध्या संपूर्ण देशभरात हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू आहे. यातच, कँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सोमवारी मोठे विधान केले. द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असे अय्यर यांनी म्हटले आहे. 

एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले. "देशात द्वेष पसरवला जातोय" -काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदीच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने राहावे, प्रत्येकाने एकमेकांसोबत शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतीयांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश आहे आणि येथे सर्वजण सोबत राहतात.

"राजीव गांधी दोन वेळा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना..." -काही दिवसांपूर्वी, राजीव गांधी यांच्या पात्रतेसंदर्भात मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "राजीव गांधी एक वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणे तसे कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. अशा व्यक्तीला भारताचे पंतप्रधान कसे काय बनवले गेले," असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसHinduismहिंदुइझमMuslimमुस्लीम