शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:09 IST

दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली.

जोधपूर -  दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली. या दोन प्रवाशांना जोधपूर या ठिकाणी जायचं होतं मात्र मुंबई ते जोधपूर हा विमान खर्च परवडत नसल्याने त्यांनी मुंबई ते जयपूर या विमानाचे स्वस्त तिकीट घेतले. नियोजित वेळेनुसार मुंबई ते जयपूर या विमानाने उड्डाण घेतले. एअर इंडियाचे हे विमान जोधपूरमार्गे जयपूरला जाणार होतं. 

काही वेळानंतर विमान जोधपूर रनवे उतरण्यात आलं. जोधपूरपर्यंत जाणारे सर्व प्रवाशी विमानातून खाली उतरत होते. या प्रवाशांच्या रांगेमधून हळूच कोणालाही न कळता ते दोन प्रवाशी जोधपूर एअरपोर्टला उतरुन निघून गेले. मात्र काही क्षणात हे विमान जयपूरसाठी रवाना होणार होते. तेव्हा विमानातील जयपूरला जाणारे 2 प्रवाशी गायब झाल्याने विमानामध्ये खळबळ माजली. यानंतर चौकशी करुन त्या दोन प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला. 

एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन करुन पुन्हा येण्यासाठी विनंती केली. मात्र नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत त्या प्रवाशांनी पुन्हा विमानात येण्यास नकार दिला. मात्र या दोन प्रवाशांच्या कारनाम्यामुळे तब्बल 45 मिनिटे एअर इंडियाचे विमान जोधपूर रनवेवर उभं होतं. गुरूवारी एअर इंडियाच्या विमानाची मुंबई ते जयपूर तिकीट 10 हजार 30 रुपये होती तर मुंबई ते जोधपूर विमानाचा दर 17 हजार 695 रुपये होता. 

नागरी विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाने ज्या ठिकाणापर्यंतची तिकीट घेतली आहे त्याला तिथेपर्यंतचा प्रवास करणे बंधनकारक असतो. या प्रवासादरम्यान जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या प्रवाशाला मध्ये उतरण्याची परवानगी दिली जाते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मध्येच सोडण्याची परवानगी कोणत्याही प्रवाशाला दिली जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत अंतिम ठिकाणापर्यंत पोहचण्याआधी जवळच्या विमानतळावर लॅंडिग केलं जातं. आणि त्या प्रवाशाला उतरण्याची परवानगी दिली जाते. 

6 ऑगस्ट 2017 रोजी दिल्लीहून जयपूर व्हाया जोधपूर जाणाऱ्या विमानात नेव्हीच्या एका अधिकाऱ्याने जोधपूरला उतरण्याची विनंती केली होती. मात्र एव्हिएशन कंपनीने त्यांना परवानगी नाकारली होती.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाticketतिकिटAirportविमानतळ