शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

2 कोटी रोजगार माझ्या खात्यानेच दिले, गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:49 AM

बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत.

नवी दिल्ली - बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत. भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करु असं आश्वासन दिलं होतं त्यावरुन विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला. मग 2 कोटी रोजगारांचे झाले काय असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला जाऊ लागला. त्यावर नितीन गडकरी यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत देताना भाष्य केलं आहे. 

नितीन गडकरी यांनी सांगितले की, दोन कोटी रोजगार तर फक्त त्यांच्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले असंही गडकरींनी सांगितले. 

तसेच गंगा स्वच्छतेवरुन विरोधकांवर टीका करताना गडकरी म्हणाले की, गंगा स्वच्छ झाली आहे. अलाहाबादहून कानपूर आणि हरिद्वारपर्यंत काही अडचणी आहेत. गेल्या कुंभाच्या वेळी घाण पाणी पाहून मॉरिशसचे पंतप्रधान स्नान न करताच गेले होते. या वेळी गंगा स्वच्छ होती, आम्ही ३०% कामच केले आहे. पुढील मार्चपर्यंत १००% करू. २६ हजार कोटींचे प्रकल्प आणत आहोत. पाणी स्वच्छ नसते तर प्रियंका गंगेचे पाणी प्यायल्या असत्या का? असा सवाल नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. पक्षात लोकशाही व्यवस्था आहे. सध्या त्याची गरज नाही. कारण आम्हाला बहुमत मिळणार आहे. मात्र मी पुन्हा अध्यक्ष होणार नाही. मी एकदा अध्यक्ष झालो. काही दोष नसतानाही माझ्यावर आरोप झाले. चौकशीत निर्दोष सुटलो असं ते म्हणाले. 

२०१४ मध्ये यूपीएबद्दल नाराजी होती. भाजपने जेव्हा नरेंद्र मोदींना एनडीएचा नेता निवडले तेव्हा लोकांच्या मनात आशा होती की हे स्थिती बदलतील. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा वाढली असून काँग्रेसला माहीत आहे आपण सत्तेत येणार नाही त्यामुळेच न्याय सारख्या योजना आणण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येतं आहे असा टोला नितीन गडकरी यांनी केला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकारElectionनिवडणूक