शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

केंद्र सरकारविरुद्ध वाद चिघळला; Twitter नं भारताच्या नकाशातून जम्मू काश्मीरचा भाग वगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:01 IST

पहिल्यांदाच ट्विटरकडून अशाप्रकारे कृत्य झालं असं नाही तर याआधीही १२ नोव्हेंबरला असं घडलं होतं.

ठळक मुद्देआणखी काही देशांचे नकाशे आहेत. परंतु कोणतेही नकाशे चुकीचे नाहीत नकाशात बदल कधी केला? तो ट्विटरच्या वेबसाईटवर कधी टाकला?लवकरच या प्रकरणी केंद्र सरकारला ट्विटरला नोटीस पाठवणार आहे.

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद चिघळत असताना ट्विटरचा मनमानी कारभार आता समोर आला आहे. ट्विटरने भारताच्या नकाशात फेरफार करत ट्विटरच्या वेबसाईटवर जम्मू आणि काश्मीर हा भाग भारताचा हिस्सा नसल्याचं दाखवलं आहे. सरकारकडून ट्विटरने केलेल्या प्रकाराबाबत गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे लवकरच भारत सरकार ट्विटरला नोटीस जारी करेल. इतकचं नाही तर या प्रकरणात ट्विटरविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.

ट्विटरकडून एका ट्विटमध्ये फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात भारताचा नकाशा ठळकपणे वेगळा असल्याचं दाखवलं आहे. त्याशिवाय आणखी काही देशांचे नकाशे आहेत. परंतु कोणतेही नकाशे चुकीचे नाहीत. केवळ भारताच्या नकाशासोबत ट्विटरवर फेरफार केला आहे. भारताच्या नकाशात देशाचं शिर म्हणून ओळखलं जाणारं जम्मू काश्मीर या प्रदेशाला वेगळा देश असल्याचं ट्विटरने दाखवलं आहे. ट्विटरच्या या प्रकाराची सरकारने दखल घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबत अनेक तथ्य जमा केली जात आहे. नकाशात बदल कधी केला? तो ट्विटरच्या वेबसाईटवर कधी टाकला? त्यासोबत भारताचा नकाशा बदलण्यामागे ट्विटरचा हेतू काय होता? ज्यांनी हा नकाशा बनवला ते लोक कोण आहेत? किती जणांनी ट्विटरवर हा नकाशा अपलोड केला आहे? सरकार या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी तपास करत आहे. लवकरच या प्रकरणी केंद्र सरकारला ट्विटरला नोटीस पाठवणार आहे. ट्विटरवर सरकार मोठी कारवाई करू शकते असंही बोललं जात आहे.

पहिल्यांदाच चूक नाही तर सात महिन्यात पुन्हा घडला प्रकार

पहिल्यांदाच ट्विटरकडून अशाप्रकारे कृत्य झालं असं नाही तर याआधीही १२ नोव्हेंबरला असं घडलं होतं. त्यावेळी लडाख हा चीनचा भाग असल्याचं ट्विटरने दाखवलं होतं. त्यावेळी सरकारकडून ट्विटरबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा ट्विटरने लिखित स्वरुपात माफी मागितली होती. त्या माफीनाम्यात ट्विटरने म्हटलं होतं की, भविष्यात अशाप्रकारे चूक होणार नाही. परंतु सात महिन्याच्या कालावधीतच ट्विटरने भारताच्या नकाशातून जम्मू काश्मीरला वगळून मोठी चूक केली आहे.

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष

नवीन आयटी नियमांविरोधात सरकार आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी ट्विटरकडून अशाप्रकारचं कृत्य झाल्यानं सरकार यावर कारवाई करू शकतं. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ७९ वे कलम सोशल मीडिया कंपन्यांना एक वेगळे कायदेशीर संरक्षण देते. त्यानुसार या माध्यमांवर टाकलेल्या मजकुराची जबाबदारी कंपनीची नव्हे, तर संबंधित व्यक्तीची असते. कंपनीला अशा मजकुराचे प्रकाशक मानले जात नाही. हे संरक्षण हटविण्यात आल्यामुळे यापुढे ट्विटरवर टाकलेले कोणतेही ट्वीट किंवा पोस्टची कायदेशीर जबाबदारी त्या व्यक्तीसोबतच ट्विटर कंपनीचीही राहील. वादग्रस्त, प्रक्षोभक ट्वीटसाठी कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकेल. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर आणि सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे.

टॅग्स :Twitterट्विटरCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत