शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 09:36 IST

जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित पोहोचले आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 24 मजूर ठार झाले आहेत. तसेच 15 लोक जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकने कामगारांना घेऊन जाणा-या डीसीएमला धडक दिली, अपघातात 24 लोक ठार, तर 15 जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रकने धडक दिली, तेव्हा डीसीएम रस्त्यावर उभा होता. औरैया, एसपी सुनिती सिंह आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस मदत व बचावकार्यात व्यस्त आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. घटनेचा विचार करता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारीही जागरूक झाले आहेत. तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाल्याचे ओरैया सीएमओ अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितले. 22 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींपैकी 15 जणांना सेफाई पीजीआय येथे दाखल करण्यात आले आहे. ते सर्व मजूर राजस्थानहून बिहार-झारखंडला जात होते. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनकया घटनेनंतर समोर आलेल्या चित्रात मजुरांच्या मालाचा ढीगदेखील पाहायला मिळतो आहे. एसपी औरैया यांच्याशी घटनेविषयी सांगितले की, ही घटना पहाटे 3 ते 4 दरम्यान घडल्याचे घडली. बचावकार्य सध्या सुरू आहे. जखमींपैकी काही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सैफईसाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर डीएम औरैया अभिषेक सिंह यांनी म्हटले आहे की, यातील बहुतेक लोक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते.सीएम योगी यांनी घटनेची घेतली दखलमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेतली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री योगी यांनी पीडितांना सर्वतोपरी दिलासा देण्याचे तसेच सर्व जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मंडलयुक्त कानपूर आणि आयजी कानपूर यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीखाली मदतकार्य करण्याचे, अपघाताचे कारण तपासून माहिती देण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात