शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 5:47 PM

त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती.

ठळक मुद्देमागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते.त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले.

नवी दिल्ली - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडच्या दोन राज्यांमधील भाजपाची प्रगती अनेक अंगांनी महत्वपूर्ण आहे. त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती. यापूर्वी अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. पण त्रिपुरामध्ये भाजपा पूर्णपणे नरेंद्र मोदींवर अवलंबून नव्हता. भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्रिपुरा जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता.  

मागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, मुख्य निवडणूक रणनितीकार हेमंत बिस्वा सरमा आणि सुनील देवधर हे तिघेही रणनिती आखण्यापासून ते नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी मेहनत घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले सुनील देवधर हे 500 पेक्षा जास्त दिवसांपासून त्रिपुरामध्ये तळ ठोकून होते. मोदी सरकारच्या योजना राज्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना ईशान्येकडच्या राज्यांना भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालण्याची सूचना केली होती. आरएसएसचे प्रांत प्रमुखही आपल्या संघटनात्मक कार्यावर विशेष लक्ष देत होते. निवडणूक काळात मोदी सरकारमधील एकूण 52 मंत्र्यांनी त्रिपुराचा दौरा केला. यापूर्वी कधीही इतके मंत्री राज्यात फिरकले नव्हते. पंतप्रधानांनी इतके बारीक लक्ष घातल्यामुळे राज्यातील जनतेत विश्वास निर्माण झाला आणि या विश्वासाचे रुपांतर विजयात झाले असे सुनील देवधर यांनी सांगितले. 

सरसंघचालक मोहन भागवतही डिसेंबरमध्ये त्रिपुरात आले होते. बेरोजगारी, विकासाचा अभाव यांना मुद्दा बनवत भाजपाने त्रिपुरात आघाडी घेतली व डाव्यांना आपणच योग्य पर्याय असल्याचे पटवून दिले. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. फक्त 1.54 टक्के मते भाजपाला मिळाली होती. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सर्वच्या सर्व 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे अशा राज्यात विजय खेचून आणण्याचे देवधर यांच्यासमोर अत्यंत कठिण आव्हान होते. भाजपाने इथे छोटया पक्षांबरोबर हातमिळवणी केली. आदिवासी पट्टयात जनाधार असलेल्या आयपीएफटी पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्याचा भाजपाला मोठा फायदा झाला.                        

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ