शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:58 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता.

- समीर परांजपेयंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद््ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता. तर आपला बालेकिल्ला सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात पूर्वीपेक्षा आक्रमक पवित्रा घेतला. या संघर्षाचे प्रतिबिंब निकालात पाहायला मिळत असून, पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांपैकी तृणमूल काँग्रेस २३, भाजप १८ जागांवर तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममता बॅनर्जी यांनी संपुष्टात आणली होती. आक्रमक नेतृत्वशैली असलेल्या ममतांनी दाखविलेल्या विकासाच्या स्वप्नांची बंगाली माणसाला भुरळ पडली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राज्याची अपेक्षित प्रगती होत नसल्याने तेथील सामान्य माणसे दुसऱ्या सशक्त पर्यायाच्या शोधात होती. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे नाममात्र अस्तित्व उरले आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पुढे सरसावला.या राज्यात पाय रोवण्यासाठी तृणमूल काँग्रेसशी संघर्ष करणे अपरिहार्य होते. एके काळी एनडीएचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस नंतर राजकीय मतभेदांमुळे या आघाडीपासून दूर गेला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय नाराज आहेत. पश्चिम बंगालमध्ये शारदा व अन्य चीट फंडांचा काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचा भाजपचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे आहे. कोलकाताचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकालाच जेरबंद करण्याची अभूतपूर्व कृती ममता बॅनर्जी सरकारने केली. लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतला होता. ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात एकमेकांवर वैय क्तिक स्वरूपाची टीका केली. फोनी वादळासंदर्भात बंगालमधील स्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी केलेला फोनही ममतांनी घेतला नाही. मोदींची कार्यशैली, त्यांनी न पाळलेली आश्वासने यांच्यावर ममतांनी कोरडे ओढले होते. तर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत असा प्रहार मोदी भाषणांतून करत होते.कोलकातात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळी तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. या गोष्टींमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. डाव्या पक्षांची मतेही भाजपकडे वळल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या राज्यात २०२१ साली विधानसभा निवडणुका असून त्यात ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

>निकालाची कारणेममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पश्चिम बंगालचा विकास विकास होत नसल्याचा भाजपचा प्रचार सामान्य मतदारांना पटू लागला होता.त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज करणे हे उद्दिष्ट भाजपने मनाशी धरले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने पद्धतशीरपणे रान पेटविले.डावे, काँग्रेस हे या राज्यात क्षीण असल्याने तृणमूल व भाजपमध्येच खरी लढत झाली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019