शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

तुटलेल्या चाकासह १० किमीपर्यंत धावली ट्रेन, एका प्रवाशामुळे वाचले शेकडो प्राण, अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 14:49 IST

Indian Railway: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील दरभंगा येथून मुंबईला जात असलेल्या एका प्रवाशामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवले नसते तर ओडिशामधील बालासोरमध्ये घडलेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडला असता.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील दरभंगा येथून मुंबईला जात असलेल्या एका प्रवाशामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवले नसते तर ओडिशामधील बालासोरमध्ये घडलेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडला असता. मात्र सुदैवाने हा मोठा अपघात टळला. 

जयनगरमधून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणारी पवन एक्स्प्रेस मुझफ्फरपूर येथून निघाली तेव्हा ट्रेनमधून वेगळाच आवाज येऊ लागला. त्याची कल्पना ना ट्रेनच्या ड्रायव्हरला आली, ना ट्रेनच्या गार्डला कळलं. मात्र ट्रेनमधील एस ११ डब्यातून प्रवास करणाऱ्या दरभंगा येथील राजेश दास यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. मात्र काही समजण्यापूर्वी ट्रेन भगवानपूर स्टेशनपर्यंत पोहोचली होती. ट्रेन थांबताच राजेश यांनी ट्रेनखाली वाकून पाहिले. तेव्हा एस ११ डब्याखालील ट्रेनचं चाक सुमारे १० इंचांपर्यंत तुटलेलं आढळलं. ते याबाबत ड्रायव्हरला काही सांगण्यापूर्वीच ट्रेन पुन्हा सुरू झाली.

मात्र राजेश यांनी घटनेची माहिती इतर प्रवाशांना दिली. तसेच चेन खेचण्यासाठी आग्रह केली. त्यानंतर एका प्रवासाने ट्रेन खेचली. ट्रेन थांबली. तेव्हा ट्रेनचं चाक तुटल्याची माहिती ट्रेनचा ड्रायव्हर आणि आपल्या कर्मचाऱ्यांना दिली. ही ट्रेन भगवानपूर येथे  सहा वाजून १० मिनिटांनी थांबली होती. त्यानंतर सोनपूर रेल्वे मंडळातून तज्ज्ञांचं पथक अतिरिक्त डबा घेऊन आले. त्यानंतर सुमारे पाच तासांनंतर रात्री ११.२० मिनिटांनी ट्रेन रवाना करण्यात आली. ट्रेन रवाना होताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातBiharबिहार