शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दारुमुक्ती तंटामुक्ती ही सापटण्याची परंपरा

By admin | Updated: February 20, 2016 02:01 IST

तंटामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळे परिवाराकडेच होता आणि आजही आहे. स्व. आण्णासाहेब ढवळे यांचा दरारा केवळ सापटण्यातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही होता. आण्णांकडे आलेले तंटे निकाली काढण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजूबाजूच्या गावचे लोकही तंटे मिटवण्यासाठी आण्णांच्या दरबारात यायचे. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त दरारा होता. आजही त्यांच्या कुटुंबातील तात्यासाहेब ढवळे हे निवाडे करण्याचे काम करतात. एक नव्हे अनेक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. गावाला निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत.

तंटामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळे परिवाराकडेच होता आणि आजही आहे. स्व. आण्णासाहेब ढवळे यांचा दरारा केवळ सापटण्यातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही होता. आण्णांकडे आलेले तंटे निकाली काढण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजूबाजूच्या गावचे लोकही तंटे मिटवण्यासाठी आण्णांच्या दरबारात यायचे. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त दरारा होता. आजही त्यांच्या कुटुंबातील तात्यासाहेब ढवळे हे निवाडे करण्याचे काम करतात. एक नव्हे अनेक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येतात. गावाला निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत.
चौकट
तंटामुक्तीचे फळ
स्व. आण्णासाहेब ढवळे हे तंटे मिटवण्यात प्रसिद्ध होते. चाकण येथील लुंकड यांच्या कंपनीत संपावर गेलेल्या कामगारांचा तंटा आण्णांनी मिटवला होता. तेव्हा खूश झालेल्या लुंकड शेठनी आण्णांना काहीतरी घ्या, असा आग्रह केला. तेव्हा आण्णांनी लुंकड शेठला सापटणेला आणले आणि या गावासाठी काय द्यायचे ते द्या, असे सांगितले. तेव्हा लुंकड शेठनी गावाला वेस बांधून दिली. एक मशीद, तालीम आणि हायस्कूलला आठ खोल्या बांधून दिल्या. तसेच अनेक पडकी घरे बांधकामासाठी आणि गावाला रंग देण्यासाठी त्यांनी मदत केली. आण्णांच्या तंटामुक्तीचा अख्ख्या गावाला असा फायदा झाला.
पंढरपूरला जाणार्‍या बहुतांशी दिंड्या सापटणेमार्गे जातात. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था सापटणे ग्रामस्थ करतात. अनेक दिंड्या येतात. त्यासाठी वर्षातून एकदा ज्वारी, गहू असे धान्य गोळा करून ठेवले जाते आणि त्यातून वारकर्‍यांना अन्नदान केले जाते.
गावात लोकवर्गणीतून बांधलेले सुमारे एक कोटीचे हनुमान व महादेव मंदिर असून त्यामध्ये इतर देवतांच्याही मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. गावातले रस्ते काँक्रीटचे आहेत. घरोघरी नळपाणीपुरवठा योजना चालू असून लवकरच होळे पाणीपुरवठा योजनेचे पाणी येणार आहे. हरिजन वस्ती सुधारणा केली आहे. गावच्या दोन्ही जि. प. शाळांना आयएसओ दर्जा मिळाला आहे.