शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:51 IST

भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा...

नवी दिल्ली -  केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 2003 साली वाजपेयी सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावानंतर प्रथमच कुठल्याही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला जाणार आहे. भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिकवेळा इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहे. जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांना स्वपक्षीय आणि विरोधकांकडून अनेकवेळा विरोधाचा सामना करावा लागला होता. दीर्घकाळ देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात सर्वाधिक 15 वेळा अविश्वास प्रस्ताव मांडला गेला. त्यापैकी 1966 ते 1975 या काळात इंदिरा गांधींना 12 वेळा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले. तर 1981 आणि 1982 मध्ये तीन वेळा त्यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. भारतात सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला होता. 1963 साली आचार्य जे.बी. कृपलानी यांनी नेहरूंच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव तब्बल 347 मतांनी फेटाळला गेला होता. त्यानंतर एकूण 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडले गेले आहेत. त्यापैकी तीन वेळा अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सरकार पडले. तर तीन वेळा अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पंतप्रधानांनी राजीनामे दिले. दरम्यान, मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने उरलेले विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील, पण ठराव संमत होण्याची शक्यता अजिबातच नाही. आपला ठराव संमत होणार नाही, हे विरोधकांनाही माहीत आहे आणि ते तसे मान्यही करीत आहेत. पण यानिमित्ताने सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. त्यामुळे सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार