शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:51 IST

भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा...

नवी दिल्ली -  केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 2003 साली वाजपेयी सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावानंतर प्रथमच कुठल्याही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला जाणार आहे. भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिकवेळा इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहे. जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांना स्वपक्षीय आणि विरोधकांकडून अनेकवेळा विरोधाचा सामना करावा लागला होता. दीर्घकाळ देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात सर्वाधिक 15 वेळा अविश्वास प्रस्ताव मांडला गेला. त्यापैकी 1966 ते 1975 या काळात इंदिरा गांधींना 12 वेळा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले. तर 1981 आणि 1982 मध्ये तीन वेळा त्यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. भारतात सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला होता. 1963 साली आचार्य जे.बी. कृपलानी यांनी नेहरूंच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव तब्बल 347 मतांनी फेटाळला गेला होता. त्यानंतर एकूण 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडले गेले आहेत. त्यापैकी तीन वेळा अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सरकार पडले. तर तीन वेळा अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पंतप्रधानांनी राजीनामे दिले. दरम्यान, मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने उरलेले विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील, पण ठराव संमत होण्याची शक्यता अजिबातच नाही. आपला ठराव संमत होणार नाही, हे विरोधकांनाही माहीत आहे आणि ते तसे मान्यही करीत आहेत. पण यानिमित्ताने सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. त्यामुळे सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार