शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

"आजचं युद्ध कालच्या शस्त्रांनी जिंकू शकत नाही, त्यासाठी..."; CDS प्रमुख अनिल चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:05 IST

Anil Chauhan CDS: भारताचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ अनिल चौहान यांनी युद्धाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या नव तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक शस्त्रास्त्राबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. 

CDS Anil Chauhan News: ऑपरेशन सिंदूरवेळी अत्याधुनिक ड्रोनचा झालेला वापर आणि संरक्षण क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कालच्या शस्त्रांच्या बळावर आजचे युद्ध जिंकले जाऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणून करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सीडीएस प्रमुख अनिल चौहान नवी दिल्लीत बुधवारी (१५ जुलै) यूएव्ही आणि सी यूएएस या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. 

सध्याच्या काळात युद्ध अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीने लढले जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. भविष्यात जे युद्ध होतील, त्यामध्ये ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला जाऊ शकतो असेही चौहान म्हणाले. 

सीडीएस प्रमुख म्हणाले, ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की...

कार्यशाळेत बोलताना सीडीएस प्रमुख अनिल चौहान म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की, आपल्या भूभागासाठी स्वदेशी बनावटीची मानवरहित एअर डिफेन्स सिस्टिम का महत्त्वाची आहे. आपल्याला आपल्या संरक्षणासाठी गुंतवणूक करावी लागेल. ऑपरेशन सिंदूरच्या काळात १० मे रोजी पाकिस्तानने बिना शस्त्र असणाऱ्या ड्रोनचा वापर केला होता. त्यातील कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्कराच्या किंवा नागरिक वसाहतीचे नुकसान केले नाही. बहुतांश ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले. काही ड्रोन्स तर व्यवस्थित अवस्थेत सापडले", असे चौहान म्हणाले. 

ड्रोनमुळे युद्धाचे स्वरुप बदलले

सीडीएस चौहान म्हणाले, "भविष्यात होणाऱ्या युद्धांमध्ये ड्रोनचा वापर वाढेल. जेव्हा आपण ड्रोनबद्दल बोलतो, तर तुम्हाला काय वाटतं? ड्रोन युद्धाचे स्वरुप बदलून टाकत आहेत का? मला वाटते की, युद्धामध्ये यांचा वापर खूपच क्रांतिकारी आहे. जसे जसे यांचे स्वरुप व्यापक होत गेले, तसे तसे लष्कराने क्रांतिकारी पद्धतीने त्याचा वापर सुरू केला आहे."

अनिल चौहान म्हणाले, "परदेशातील तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे, तयारी कमकुवत करते. आजचे युद्ध हे कालच्या शस्त्रांनी जिंकता येऊ शकत नाही. आजच्या युद्धासाठी नवीन तंत्रज्ञान गरजेचे आहे. कारण आजचे युद्ध हे उद्याच्या तंत्रज्ञानांशी लढावे लागणार आहे. तेव्हाच युद्ध जिंकले जाऊ शकते", असे चौहान यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक