शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

"आजचं युद्ध कालच्या शस्त्रांनी जिंकू शकत नाही, त्यासाठी..."; CDS प्रमुख अनिल चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:05 IST

Anil Chauhan CDS: भारताचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ अनिल चौहान यांनी युद्धाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या नव तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक शस्त्रास्त्राबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. 

CDS Anil Chauhan News: ऑपरेशन सिंदूरवेळी अत्याधुनिक ड्रोनचा झालेला वापर आणि संरक्षण क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कालच्या शस्त्रांच्या बळावर आजचे युद्ध जिंकले जाऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणून करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सीडीएस प्रमुख अनिल चौहान नवी दिल्लीत बुधवारी (१५ जुलै) यूएव्ही आणि सी यूएएस या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. 

सध्याच्या काळात युद्ध अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीने लढले जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. भविष्यात जे युद्ध होतील, त्यामध्ये ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला जाऊ शकतो असेही चौहान म्हणाले. 

सीडीएस प्रमुख म्हणाले, ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की...

कार्यशाळेत बोलताना सीडीएस प्रमुख अनिल चौहान म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवले की, आपल्या भूभागासाठी स्वदेशी बनावटीची मानवरहित एअर डिफेन्स सिस्टिम का महत्त्वाची आहे. आपल्याला आपल्या संरक्षणासाठी गुंतवणूक करावी लागेल. ऑपरेशन सिंदूरच्या काळात १० मे रोजी पाकिस्तानने बिना शस्त्र असणाऱ्या ड्रोनचा वापर केला होता. त्यातील कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्कराच्या किंवा नागरिक वसाहतीचे नुकसान केले नाही. बहुतांश ड्रोन्स हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले. काही ड्रोन्स तर व्यवस्थित अवस्थेत सापडले", असे चौहान म्हणाले. 

ड्रोनमुळे युद्धाचे स्वरुप बदलले

सीडीएस चौहान म्हणाले, "भविष्यात होणाऱ्या युद्धांमध्ये ड्रोनचा वापर वाढेल. जेव्हा आपण ड्रोनबद्दल बोलतो, तर तुम्हाला काय वाटतं? ड्रोन युद्धाचे स्वरुप बदलून टाकत आहेत का? मला वाटते की, युद्धामध्ये यांचा वापर खूपच क्रांतिकारी आहे. जसे जसे यांचे स्वरुप व्यापक होत गेले, तसे तसे लष्कराने क्रांतिकारी पद्धतीने त्याचा वापर सुरू केला आहे."

अनिल चौहान म्हणाले, "परदेशातील तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे, तयारी कमकुवत करते. आजचे युद्ध हे कालच्या शस्त्रांनी जिंकता येऊ शकत नाही. आजच्या युद्धासाठी नवीन तंत्रज्ञान गरजेचे आहे. कारण आजचे युद्ध हे उद्याच्या तंत्रज्ञानांशी लढावे लागणार आहे. तेव्हाच युद्ध जिंकले जाऊ शकते", असे चौहान यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानwarयुद्धOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक