शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 15:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे.

मऊ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे. कोलकाता येथे अमित शहांच्या रोड शोनंतर भाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊन तिचे रुपांतर हिंसाचारात झाले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आज मी पुन्हा बंगालमध्ये जाणार आहे. पाहुया, आता काय होते ते, असे मोदींनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील मऊ येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील घटनाक्रमाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मिदनापूर येथील माझ्या सभेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला माझे भाषण थांबवावे लागले होते. आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्यासभेदरम्यान गोंधळ घातला. मात्र आज मी पुन्हा बंगालच्या दौऱ्यावर जात आहे. पाहुया काय होते ते,'' अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी तृणमूलला आव्हान दिले. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथे झालेल्या रोड शो दरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी मोडतोड झालेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची नव्याने स्थापना करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले. रोड शोमध्ये गोंधळ घालणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, असा आरोप मोदींनी यावेळी केला.  भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथे झालेल्या रोड शो दरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. यावेळी समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीचीही मोडतोड झाली होती.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक