शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:05 IST

Onion Price: अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून कांद्याचे भाव चढे राहिले आहेत. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रतिचा कांदा ५० ते ९० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचं बजेट बिघडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. या काळात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा सुरळीत राहावा आणि किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी एकही कांदा देशाबाहेर जाता कामा नये, असे सक्त आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यापार संचालनालयाने आज सकाळी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये थोडा बदल केला जात आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत देशाबाहेर कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच साखरेच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठीही केंद्र सरकारने साखर कारखान्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमधील लासलगावसह इतर बाजारांमधील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. तसेच नाशिकमधील उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे.  

टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीNashikनाशिक