शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल, उत्पादक शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:05 IST

Onion Price: अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून कांद्याचे भाव चढे राहिले आहेत. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रतिचा कांदा ५० ते ९० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचं बजेट बिघडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. या काळात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा सुरळीत राहावा आणि किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी एकही कांदा देशाबाहेर जाता कामा नये, असे सक्त आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यापार संचालनालयाने आज सकाळी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये थोडा बदल केला जात आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत देशाबाहेर कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच साखरेच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठीही केंद्र सरकारने साखर कारखान्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमधील लासलगावसह इतर बाजारांमधील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. तसेच नाशिकमधील उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे.  

टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीNashikनाशिक