शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 3:08 PM

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली

नवी दिल्ली - राजीव गांधी यांच्या हत्येला काँग्रेस सरकार त्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीला जबाबदार मानते. १९८९ मध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार बनले तेव्हा राजीव गांधी यांना मिळालेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा हटवली होती. परंतु जर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टीएन शेषन यांचा एक सल्ला ऐकला असता तर ८९ मध्ये त्यांची सुरक्षा हटवली गेली नसती. 

भारतातील निवडणूक आयोगाचे सुधारक मानले जाणारे टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांना माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्याचा सल्ला दिला होता. परंतु राजीव गांधी यांनी तो सल्ला न ऐकता तो प्रस्ताव फेटाळला. भविष्यातील सुरक्षेसाठी हे स्वार्थी पाऊल असेल असे राजीव गांधींना वाटले. त्यावेळी शेषन हे पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा इन्चार्ज होते. टीएन शेषन यांचा हा खुलासा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेले नवीन पुस्तक थ्रू द ब्रोकन ग्लासमध्ये झाला आहे. ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या टीएन शेषन यांना राजीव गांधींसोबत अघटित घडणार असल्याचे संकेत मिळाले होते. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली. जेव्हा कायदा तयार होत होता तेव्हा टीएन शेषन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सल्ला दिला होता की, एसपीजी सुरक्षेच्या अंतर्गत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश करावा. माजी निवडणूक मुख्य आयुक्त टीएन शेषन यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात हा खुलासा झाला आहे. शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले. 

इंग्लिश न्यूज वेबसाईटनुसार, एका रिपोर्टमध्ये या पुस्तकातील या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात शेषन यांनी राजीव गांधी यांना त्यांचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. शेषन यांनी राजीव गांधींना सतर्क केले होते. पंतप्रधानपदावरून दूर झाल्यानंतर राजीव गांधींच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो. यासाठी अमेरिकेचे उदाहरण देत एफबीआय माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाते असं सांगितले. परंतु राजीव गांधी यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही. मी त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. 

पुस्तकात शेषन यांनी ज्योतिषशास्त्रातील त्यांची आवडही नमूद केली आहे. राजीव गांधींच्या अकाली मृत्यूची पूर्वकल्पनाही त्यांनी दिली होती. त्यामुळेच शेषन यांनी राजीव गांधींना मे १९९१ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता. १० मे १९९१ रोजी टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. पण माजी पंतप्रधानांनी चिंता फेटाळून लावली. १७ मे रोजी शेषन यांनी राजीव यांना एक फॅक्स पाठवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा संदेश वाचण्याआधीच २१ मे रोजी श्रीपेरुंबदुर येथे आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी