शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आमची मते आयत्या वेळी काँग्रेसकडे वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 05:22 IST

अरविंद केजरीवाल; कसे घडले तपासणार

नवी दिल्ली : आम्ही दिल्लीतील सातच्या सात लोकसभेच्या जागा जिंकल्या असत्या. पण आयत्या वेळी डाव पलटला. आम आदमी पक्षाला मिळणारी सारी मते अचानक काँग्रेसकडे गेली, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला सर्व सात जागा जिंकण्याची खात्री होती. पण आयत्या वेळी ‘आप’ मते काँग्रेसकडे गेली. हे सारे निवडणुकीच्या एक दिवस आधी घडले. दिल्लीतील मुस्लिमांची मते काँग्रेसकडे का व कशी गेली याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. दिल्लीत मुस्लिम समाजाची सुमारे १३ टक्के मते आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यास दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष व उमेदवार शीला दीक्षित यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, केजरीवाल असे का सांगत आहेत, हे समजत नाही. प्रत्येक पक्षाला सर्वांची मते मागण्याचा अधिकार आहे आणि कोणाच्याच मतांवर कोणताही पक्ष आपला हक्क सांगू शकत नाही. कोणत्याही पक्षाची अशी स्वत:ची हक्काची मते नसतात. तुमच्या सरकारचे कामकाज न आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली आहेत. त्याबद्दल केजरीवाल यांनी कुरकुर करण्याचे कारण नाही.

यावेळी आप व काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चेचे गुºहाळ बराच काळ चालले. पण समझोता झालाच नाही. आता मात्र भाजप, आप व काँग्रेस अशा तिरंगी लढतीमुळे काय होईल, हे सांगणे अवघड आहे. बहुधा तीच धास्ती केजरीवाल यांना वाटत असावी. आप व काँग्रेस यांना २0१४ साली दिल्लीतील एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. सर्व जागी भाजपचा विजय झाला होता. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकांत ७0 पैकी ६७ ठिकाणी केजरीवाल यांच्या पक्षाने बाजी मारली.

आमचा पक्ष कोणत्याही स्थितीत मोदी व शहा यांना पाठिंबा देणार नाही. त्यांच्याव्यतिरिक्त जे सरकार स्थापन करू शकतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यास जे वचनबद्ध असतील, त्यांनाच पाठिेंबा असेल, असे केजरीवाल यांनी पुन्हा स्पष्ट केले.भाजपवाले माझ्या जिवावर उठलेत!भाजप माझ्या जिवावर उठली असल्याने माजी पंतप्रधान इंदिरागांधी यांच्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांकडून माझी हत्या घडवून आणली जाईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, माझे सुरक्षा कर्मचारीही भाजपच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांच्या करवी माझी हत्या केली जाईल. दिल्लीत रोडशोमध्ये एकाने केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली होती. पोलिसांच्या मते तो ‘आप’चाच असंतुष्ट कार्यकर्ता होता. पण ‘आप’ने मात्र तो हल्ला भाजपने केल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा