शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:41 IST

एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

ठळक मुद्दे१९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केलाचीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होतेतेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेली हिंसक झटापट आणि दोन्ही देशांचे लष्कर सध्या समोरासमोर येऊन उभे टाकल्याने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव आणि चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देश चीनवर नाराज आहेत. मात्र थोडीफार आक्रमक विधाने वगळता कुठलाही देश चीनविरोधात आक्रमक झालेला दिसत नाही. आपल्या देशातूनही सध्या चीनविरोधात आक्रमक वक्तव्ये होत आहेत. मात्र एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

त्याचे झाले असे होते की, १९६२ च्या युद्धानंतर चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत होता. त्यासाठी चीनकडून वेगवेगळे आरोपही करण्यात येत होते. त्यातच १९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केला होता. याबाबत चीन सरकारने भारत सरकारला पत्र लिहून भारतीय सैनिकांनी आपल्या ८०० बकऱ्या आणि ५९ याक चोरल्याचा आरोप केला.

 एकीकडे भारतीय लष्कर पाकिस्तानसोबत लढाईत गुंतले होते. तर दुसरीकडे चीन सिक्कीममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते, अशा त्या काळात भारत सरकारने हा आरोप फेटाळला.  मात्र चीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होते. वाजपेयी तेव्हा जनसंघाचे नेते होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला. या बकऱ्यांच्या शरीरावर आम्हाला खा पण जगाला वाचवा, असे उपहासात्मक पत्रही लावले होते. दरम्यान, वाजपेयींच्या या कृतीची तेव्हा खूप चर्चा झाली. भारत सरकारनेही यावरून चीनला खरमरीत उत्तर दिले. दिल्लीमध्ये कुणीतरी ८०० बोकडांचा मोर्चा काढला. मात्र भारत सरकारचा याच्याशी संबंध नाही, कुठल्याही मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात भारताच्या नागरिकांनी शांततापूर्ण आणि विनोदी मार्गाने दिलेली प्रतिक्रिया  आहे, असे सरकारने चीनला सांगितले.

मात्र या सर्व प्रकारामुळे चीनचा अपमान झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. पण त्यात चीनचेच हसे झाले. या घटनेनंतर चीनने सिक्कीममधील नथू ला येथे भारताविरोधात आगळीक केली होती. मात्र त्याला भारतीय लष्कराने सणसणीत उत्तर देऊन चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIndiaभारतchinaचीनLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री