शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:51 IST

सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला.

राजा रघुवंशी याची मेघालयमध्ये हत्या का करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर त्यांचं कुटुंब आजही शोधत आहे. सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. यासाठी त्यांनी सोनमची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. शिलाँग पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं असलं तरी, कुटुंबीय या मागणीवर ठाम आहेत. राजाच्या हत्येमागे मोठं रहस्य असू शकतं, जे नार्को टेस्टने समोर येऊ शकतं, असं त्यांना वाटत आहे. आता राजाच्या कुटुंबीयांनी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

नार्को टेस्टसाठी वकिलांची नियुक्तीसूत्रांनुसार, राजाच्या कुटुंबीयांनी शिलाँग ते दिल्लीपर्यंत खटला लढण्यासाठी तीन वकिलांची नियुक्ती केली आहे. लवकरच शिलाँग उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाईल. याव्यतिरिक्त, दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ही मागणी केली जाऊ शकते. 

राजा रघुवंशीचा भाऊ वारंवार नार्को टेस्टची मागणी करत आहे. मात्र, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि हत्येशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे नार्को टेस्टची आवश्यकता नाही.

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर घडला प्रकारसोनम रघुवंशी आणि राज यांच्यासह सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंदूरच्या सोनम आणि राजाचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. अवघ्या १० दिवसांनंतर ते दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. इथे २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोनमने अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले.

आतापर्यंतच्या तपासानुसार, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, राज आणि सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम राजच्या प्रेमात होती आणि कुटुंबाने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. राजच्या तीन मित्रांच्या मदतीने सोनमने हनिमूनदरम्यान राजाची हत्या करवून घेतली. परंतु ,राजाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, यामागचं कारण एवढंच नसावं. जर सोनमला राजशी लग्न करायचं नव्हतं, तर तिने नकार का दिला नाही? ती राजाला सोडून पळून जाऊ शकली असती? पण तिने हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे प्रश्न आजही राजाच्या कुटुंबीयांना सतावत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू