शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:51 IST

सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला.

राजा रघुवंशी याची मेघालयमध्ये हत्या का करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर त्यांचं कुटुंब आजही शोधत आहे. सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. यासाठी त्यांनी सोनमची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. शिलाँग पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं असलं तरी, कुटुंबीय या मागणीवर ठाम आहेत. राजाच्या हत्येमागे मोठं रहस्य असू शकतं, जे नार्को टेस्टने समोर येऊ शकतं, असं त्यांना वाटत आहे. आता राजाच्या कुटुंबीयांनी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

नार्को टेस्टसाठी वकिलांची नियुक्तीसूत्रांनुसार, राजाच्या कुटुंबीयांनी शिलाँग ते दिल्लीपर्यंत खटला लढण्यासाठी तीन वकिलांची नियुक्ती केली आहे. लवकरच शिलाँग उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाईल. याव्यतिरिक्त, दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ही मागणी केली जाऊ शकते. 

राजा रघुवंशीचा भाऊ वारंवार नार्को टेस्टची मागणी करत आहे. मात्र, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि हत्येशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे नार्को टेस्टची आवश्यकता नाही.

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर घडला प्रकारसोनम रघुवंशी आणि राज यांच्यासह सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंदूरच्या सोनम आणि राजाचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. अवघ्या १० दिवसांनंतर ते दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. इथे २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोनमने अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले.

आतापर्यंतच्या तपासानुसार, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, राज आणि सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम राजच्या प्रेमात होती आणि कुटुंबाने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. राजच्या तीन मित्रांच्या मदतीने सोनमने हनिमूनदरम्यान राजाची हत्या करवून घेतली. परंतु ,राजाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, यामागचं कारण एवढंच नसावं. जर सोनमला राजशी लग्न करायचं नव्हतं, तर तिने नकार का दिला नाही? ती राजाला सोडून पळून जाऊ शकली असती? पण तिने हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे प्रश्न आजही राजाच्या कुटुंबीयांना सतावत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू