शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:36 IST

कामाला लागण्याच्या सूचना : मुणगेकर, केतकर, देवरा, रजनी पाटील यांचा समावेश

शीलेश शर्मानवी दिल्ली : २0१९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन समित्या स्थापन केल्या असून, त्यांवर अनेक नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातील रजनी पाटील, भालचंद्र मुणगेकर, मिलिंद देवरा व कुमार केतकर यांना नियुक्त केले आहे. या समित्यांना तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.कोअर ग्रुपमध्ये मल्लिकार्जुन खारगे, पी. चिदम्बरम, ए. के. अँथनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश व अहमद पटेल आहेत. हा ग्रुप निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेईल. त्यावर अंतिमत: राहुल गांधी मोहोर उठवतील. अन्य पक्षांशी व राज्यवार पक्षाची भूमिका निश्चित ही जबाबदारी या ग्रुपवर असेल.

निवडणूक जाहीरनामा समितीत रजनी पाटील व डॉ. मुणगेकर आहेत. शिवाय ललितेश त्रिपाठी, शशी थरूर, मुकुल संगमा, टी. साहू, सचिन राव, सॅम पित्रोडा, मीनाक्षी नटराजन, रघुवीर मीणा, कुमारी शैलजा, बिंदू कृष्णन,सलमान खुर्शिद, जयराम रमेश, भूपेंद्रसिंग हुडा, राजीव गौडा, सुष्मिता देव, पी. चिदंबरम, मनप्रीत ब्रार यांचाही समावेश आहे. याशिवाय १३ सदस्यांची प्रचार समितीही नेमली असून, त्यात मिलिंद देवरा व कुमार केतकर आहेत. अन्य सदस्यांत भक्तचरण दास, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेडा, बी. डी. सतीशन, आनंद शर्मा, जयवीर शेरगील, राजीव शुक्ला, स्पंदना दिव्या, रणदीप सुरजेवाला व प्रमोद तिवारी यांचा समावेश आहे.

सुरजेवाला, वेणुगोपाल यांच्या निवडीने कुजबुजकोअर ग्रुपवर रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे, पण दिग्विजय सिंग, सिद्धरमय्या, जयपाल रेड्डी, अंबिका सोनी, कॅ. अमरेंद्र सिंग, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, शीला दीक्षित आदी अनुभवी नेत्यांना स्थान मिळालेले नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक