शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

...या लोकांसाठी ओसामा बिन लादेन शांतीदूत - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 11:52 IST

पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यावर केला.

धार - पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्यादिग्विजय सिंह यांच्यावर केला. मंगळवारी मध्यप्रदेशातील धार येथे भारतीय जनता पार्टीकडून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढविला. 

गेल्या काही दिवसांपासून पुलवामा हल्ल्याचे राजकारण होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा देण्याची मागणी केली गेली त्या पार्श्वभुमीवर मोदी यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. ज्या पक्षाने इतकी वर्षे देशावर राज्य केले. ज्या पक्षाच्या नेत्याने आपल्या पराक्रमी सैन्याचे हात बांधून ठेवले त्यांचेच नेते आज सैन्याच्या शौर्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याच पक्षाचे मध्यप्रदेशातील महाशय नेते यांना पुलवामा हल्ला फक्त अपघात वाटतो अशी टीका मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता केली. 

यापुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, या लोकांची मानसिकता देशातील लोकांनी समजून घ्यावी, दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी यांचे नेते पुलवामा हल्ल्याला अपघात बोलतात. पुलवामामध्ये जे झाले तो अपघात होता का असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना केला. त्याचसोबत देशातील एका घराण्याचे ते शिलेदार आहेत त्यांना ओसामा बिन लादेनही शांतीदूत वाटतो. या महाशयांनी 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यातूनही पाकिस्तानला क्लीनचीट देत चौकशी भरकटविण्याचे काम केले. 

 

दिल्लीच्या बाटला हाऊस एनकाऊंटरचा हवाला देत मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केले. काँग्रेसकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई होऊ शकते अशी अपेक्षी करू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मोदी पुढे म्हणाले की, आज हे लोक सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत आहेत, ज्यावेळी यांचे केंद्रात सरकार होते त्यावेळी दहशतवादी हल्ले झाले तरी ते गप्प बसून राहत होते. एअर स्ट्राईक पाकिस्तानात झाली मात्र त्याचे दुख: भारतातील काही लोकांना झाले असा आरोप मोदी यांनी केला. 

पाकिस्तानी टीव्हीवरचे हे पोस्टर बॉय 

विरोधी पक्षातील लोकांचे चेहरे पहा, मागील काही दिवसांपासून यांचे चेहरे पडलेले दिसत आहेत जसे यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानची भाषा हे बोलत होते. मोदीला शिव्या दिल्याने पाकिस्तानात टाळी वाजते, पाकिस्तानी मिडियात यांचे चेहरे झळकले जातात, सध्या हे लोक पाकिस्तानचे पोस्टर बॉय म्हणून प्रसिध्द झालेत. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची बोलती बंद झाली, पाकिस्तानचे पितळ उघडे पडले त्यामुळे हे लोक आता समोर येत आहेत. पुरावे मागत आहेत असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBJPभाजपाcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह