शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
2
पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
3
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
4
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
5
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
6
बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
7
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
8
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
9
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
10
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
11
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
12
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
13
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
14
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
15
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
16
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
17
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
18
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
19
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
20
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली, प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:16 IST

प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या प्रकारामुळे देशात या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)चे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले. महाराष्ट्राने कोरोना स्थितीमुळे निर्माण झालेली बिकट स्थिती व्यवस्थितरीत्या हाताळली, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याविषयी डॉ. अग्रवाल म्हणाले की, तशी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल सध्या तरी कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत. डेल्टा विषाणूला शोधण्यासाठी महाराष्ट्रातून एप्रिल-मे महिन्यापासून कोरोना विषाणूचे सुमारे ३५०० नमुने गोळा करण्यात आले. त्यांच्या तपासणीनंतर त्यात डेल्टा प्लस विषाणू सापडले; पण त्यांची संख्या अगदीच नगण्य होती.

आयजीआयबी संस्था केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारित येते. तिचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी ‘लोकमत‘ला सांगितले की, महाराष्ट्रातून कोरोनाचे नमुने गोळा करण्यासाठी व सखोल अभ्यासाकरिता आयजीआयबीने त्या राज्याशी विशेष करार केला आहे. इन्सोकॉग ही आणखी एक संस्था डेल्टा विषाणूंचे अस्तित्व शोधण्यासाठी कोरोनाचे ४५ हजार नमुने गोळा करण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लस विषाणूचा तिसरी लाट येण्याशी काही संबंध आहे, असे सुचविणारा एकही पुरावा मिळालेला नाही. आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने कोरोना स्थिती अतिशय उत्तमरीत्या हाताळली आहे. ते म्हणाले की, अजून कोरोनाची दुसरी लाट सरलेली नाही. नव्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे बेसावध न राहता आपण प्रतिबंधक नियम यापुढेही पाळत राहिले पाहिजेत.

प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य

येत्या सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार, असे भाकीत कानपूर आयआयटीने केले आहे. त्यावर आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. कानपूर आयआयटीने कोरोनाची दुसरी लाट मार्चमध्ये येणार असे केलेले भाकीत खरे ठरले होते. आता तिसऱ्या लाटेबद्दलचे निरीक्षण नोंदविण्यासाठी कानपूर आयआयटीमधील प्रा. राजेश रंजन व महेंद्र वर्मा यांनी सखोल अभ्यास केला होता. त्याचा निष्कर्ष त्यांनी नुकताच जाहीर केला.

कोरोनामुळे आतापर्यंत एकूण तीन लाख ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला तर एकूण रुग्णांची संख्या ३,००,८२,७७८ झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,२७,०५७ असून एकूण रुग्ण संख्येत हे प्रमाण २.०८ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.६१ टक्के झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार