शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:53 IST

2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते.

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. साधारणपणे 15 वर्षांपूर्वी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याला नदीपात्रात सोडले होते. मात्र तो रविवारी जिवंत परतला. ही घटना भागलपूरमधील मुरासन गावात घडली आहे. येथे 2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते. पण मुलगा जिवंत परतल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसले. ते देवाचे आभार मानत आहेत.

मुलाला झाला होता सर्पदंश -देवरिया जिल्ह्यातील भागलपूरमधील मुरासोन गावचे रहिवासी असलेले राम सुमेर यादव यांचा मुलगा अंगेश याला 2008 मध्ये सर्पदंश झाला होता. त्या वेळी तो केवळ 10 वर्षांचा होता. अंगेशला सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर गावाकडील उपचारही केले. मात्र त्याला कसल्याही प्रकारचा आराम मिळाला नाही. यानंतर त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचारही करून घेण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सर्व बाजूंनी निराशाच आल्यानंतर, लोकांच्या सांगण्यावरून रामसुमेर यांनी अंगेशला केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडून दिले होते.

गारुडी समाज्याच्या वस्ती राहिला - १५ वर्षांनंतर घरी पोहोचलेल्या अंगेशने सांगितल्यानुसार, तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा गारुडी समाजाच्या वस्तीत होता. त्याने तेथे विचारपूस केली असता अमन माळी नावाच्या एका सापाचा खेळ करणाऱ्याने त्याला नदीबाहेर काढून त्याच्यावर काही उपचार केल्याचे समजले. यानंतर तो अमन माळीसोबतच राहू लागला. अमन माळी शेजार-पाजारच्या खेड्यांत जाऊन सापाचे खेळ दाखवत असे. अंगेशही त्याच्यासोबत जाऊ लागला. काही दिवस अमन माळीसोबत कटिहारमध्ये राहिल्यानंतर, अमनने त्याला अमृतसर येथील एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामावर ठेवले. तेथून मिळणारा पगार अमन माळी घेत असे.

ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने पोहोचला घरी - अंगेशने दिलेल्या माहितीनुसार, गेल्याकाही दिवसांपासून अमन माळी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र हळूहळू त्याला त्याचे कुटुंब आणि संपूर्ण भूतकाळ आठवला होता आणि त्याला लवकरच घरी  पोहोचायचे होते. गेल्या आठवडाभरापूर्वी त्याने आझमगड जिल्ह्यातील एका ट्रक ड्रायव्हरला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. यावर ट्रकचालकाने त्याला आझमगडला पोहोचवले. तो येथून ट्रकनेच बलिया जिल्ह्यातील बेलथरा येथे पोहोचला. यानंतर याच जिल्ह्यातील मणियार पोलिस ठाण्यात गेला. मणियार पोलिसांनी अंगेशचे म्हणणे ऐकून घेत त्याला पोलीस ठाण्यात बसवले आणि त्याचा फोटो व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने गावातील सर्पंचाला पाठवला. 

कुटुंबीयांनी मानले देवाचे आभार - मुलाची माहिती मिळताच अंगेशचे कुटुंबीय मणियार पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे अंगेशने आई कमलावती देवी आणि काकू संभलवती देवी यांना पाहताच ओळखले. यनंतर अंगेश त्याच्या घरी गेला. जवळपास 15 वर्षांनंतर अंगेश घरी परतल्याचे पाहून त्याच्या दारात लोकांची गर्दी होऊ लागली. 

हा संपूर्म दैवी चमत्कार असल्याचे मानत लोक देवाचे आभार मानत आहेत. अंगेशने सांगितले की, तो आता सर्वांना ओळखू लागला आहे, त्याला हळू हळू सर्व घटना आठवत आहेत. अंगेशची आई कमलावती यांनी सांगितले की, तो त्याच्या बालपणीच्या मित्रांना आणि शिक्षकांनाही ओळखू लागला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवारJara hatkeजरा हटके