शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

होडीत भेटले, प्रेमात पडले, तिच्यासाठी राहुल बनला मुर्शाद, पण प्रेमकहाणीचा झाला भयानक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:25 IST

Uttar Pradesh Crime News: जाती, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या भिंती ओलांडून सुरू होणाऱ्या काही प्रेमकहाण्यांचा भयानक शेवट झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. धर्माच्या भिंती ओलांडून सुरू झालेल्या एका प्रेमकहाणीचा भयावह शेवट झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

जाती, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या भिंती ओलांडून सुरू होणाऱ्या काही प्रेमकहाण्यांचा भयानक शेवट झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. धर्माच्या भिंती ओलांडून सुरू झालेल्या एका प्रेमकहाणीचा भयावह शेवट झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. येथे एक तरुण आणि तरुणीमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत प्रियकराने प्रेयसीसाठी धर्मांतर करून इस्लाम धर्माचा स्वीकार केला. तरीही प्रेयसीच्या नातेवाईकांनी लग्नास नकार देत तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं. ही बाब खटकल्याने हा तरुण प्रेयसी माहेरी आली असताना तिच्या घरी गेला आणि संतापाच्या भारात चाकूने सपासव वार करून तिची हत्या केली. त्यानंतर चिडलेल्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक ठाण्यातली पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. सद्यस्थितीत पोस्टमार्टेम केल्यानंतर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, हे प्रकरण दोन समुदायांशी संबंधित असल्याने पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राहुल याची २०२२ मध्ये जकरीन नावाच्या तरुणीशी भेट झाली होते. रेल्वेच्या परीक्षेसाठी लखनौला जाण्यासाठी राहुल होडीमधून फतेहाबाद येथे जात असताना होडीमध्येच त्यांची नजरानजर झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपापले मोबाईल नंबर दिले. तसेच त्यांचं बोलणं सुरू झालं. पुढे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. राहुल याला जकरीन हिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र दोघांचाही धर्म आड येत होता. त्यामुळे प्रेमासाठी राहुलने आपला धर्म बदलला. तो राहुलपासून मुर्शाद बनला. दाढी ठेवून डोक्यावर टोपी घालू लागला. तसेच त्याने नमाज पढण्यासही सुरुवात केली. जकरीनच्या कुटुंबातील काही जणांनाही त्यांचा विवाह व्हावा, असं वाटत होतं. मात्र काही नातेवाईकांना त्यात मोडता घातला.

मुंबईत नोकरी करत असलेला राहुल अधुनमधून गावी यायचा. तेव्हा लपून छपून हे दोघेही भेटत असत. मात्र गतवर्षी डिसेंबर महिन्यात जकरीनच्या कुटुंबीयांनी तिचा दुसऱ्याच तरुणासोबत निकाह करून दिला. त्यानंतर हल्लीच जरकीन ही माहेरी आली होती. तर राहुलही गावी गेला होता.  जकरीनच्या विवाहामुळे तो संतापला होता. तसेच त्याने कथितपणे जकरीन हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, राहुल याच्या वडिलांनी जकरीन हिच्या कुटुंबीयांवरच हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, राहुलला फोन करून बोलावण्यात आलं. त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जकरीन हिची हत्याही तिच्याच कुटुंबीयांनी केली, असा दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राहुल आमचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या दोन मुलींचा विवाह झालेला आहे. राहुल मुंबईमध्ये एका मिठाईच्या दुकानात काम करत होता. त्याने धर्मांतर केल्याने गाववाले नाराज झाले होते. तसेच आमच्या कुटुंबाला टाळत होते. आता राहुलचीच हत्या झाली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट