शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 5:50 PM

भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणूक-2023 चे निकाल येत आहेत. हे निकाल पाहता, भारतीय जनता पक्ष राजस्थानात संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे जादूगर म्हणवल्या जाणार्‍या अशोक गेहलोतांचा टांगा पलटी झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या विधानसभा निवडणुकीत हत्या, लाल डायरी आणि ईडी सारखे मुद्दे विशेष चर्चेत राहिले आणि भाजपनेही या मुद्द्यांचे आपल्या प्रचारासाठी भांडवल केले. परिणामी आता भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

खरे तर, राजस्थान निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, लाल डायरी, मोदींची गॅरंटी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेसारखे मुद्दे उचलले. तर अशोक गेहलोत सरकारनेही या वर्षात आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाख करण्याबरोबरच आणि स्वस्तातल्या सिलेंडरसह अनेक आश्वासने देत डावपेच खेळले. मात्र त्या सर्वांवर, लाल डायरी, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्दे भारी पडले.

लाल डायरी प्रकरण -  खरे तर राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवा नाही. बऱ्याच दिवसांपासून यची चर्चा सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत, या मुद्द्याचे जबरदस्त भांडवल केले. एवढेच नही, तर राजस्थान सरकारमधील बरखास्त मंत्री राजेंद्र गुढा यांनी, या याडरीत आमदारांच्या घोडेबाजारीचा संपूर्ण कच्छा-चिठ्ठा असण्याचाही दावा केला  होता. यासंदर्भात बोलताना, "लाल डायरीची पानं जसजशी खुली होत आहेत, तस-तशी जादूगराची चिंता वाढत आहे. काँग्रेस सरकारने पाच वर्षांत आपले पाणी, जंगल आणि जमीन कशी विकली? राज्यातील अवैध खाण कामाचे कनेक्शन कुणापर्यंत पोहोचले आहे? हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गटबाजी -याशिवाय राजस्थानात गटबाजीही बघायला मिळाली. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद कुणापासूनही लपलेला नाही. याचा परिमाण राज्यातील पक्षाच्या कार्यकत्यांवर तर झालाच, पण जनतेतही चुकीचा संदेश गेला. खरे तर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दोघांमध्येही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यात सर्व काही सुरळित आहे आम्ही सोबत आहोत, असा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. मात्र याचा परिणाम निवडणूक निकालावर होताना दिसला नाही.

कन्हैयालाल हत्याकांड -राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलला आणि गेहलोत सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरे तर, राज्य जिंकायचे असेल, तर सर्वप्रथम मेवाड जिंकावे लागते, असे बोलले जाते आणि याच मारवाडमध्ये उदयपूर येते. भाजपने टाकलेल्या कन्हैया कुमार हत्या प्रकरणाच्या या ट्रॅपमध्ये अशोक गेहलोतही पुरते अडकले.

पेपर लिक प्रकरण आणि ईडीची एंट्री -पाच राज्यांत निवडणुका होत असताना दोन राज्यांमध्ये ईडीची एन्ट्रीही झाली. राजस्थानात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरावर पेपर लीक प्रकरणात ईडीने छापा टाकला. निवडणूक प्रचारात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला. अशोक गेहलोत यांनी प्रत्येक पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र याचा फायदा भाजपलाच मिळताना दिसला. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक