शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:51 IST

भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणूक-2023 चे निकाल येत आहेत. हे निकाल पाहता, भारतीय जनता पक्ष राजस्थानात संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे जादूगर म्हणवल्या जाणार्‍या अशोक गेहलोतांचा टांगा पलटी झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या विधानसभा निवडणुकीत हत्या, लाल डायरी आणि ईडी सारखे मुद्दे विशेष चर्चेत राहिले आणि भाजपनेही या मुद्द्यांचे आपल्या प्रचारासाठी भांडवल केले. परिणामी आता भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

खरे तर, राजस्थान निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, लाल डायरी, मोदींची गॅरंटी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेसारखे मुद्दे उचलले. तर अशोक गेहलोत सरकारनेही या वर्षात आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाख करण्याबरोबरच आणि स्वस्तातल्या सिलेंडरसह अनेक आश्वासने देत डावपेच खेळले. मात्र त्या सर्वांवर, लाल डायरी, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्दे भारी पडले.

लाल डायरी प्रकरण -  खरे तर राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवा नाही. बऱ्याच दिवसांपासून यची चर्चा सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत, या मुद्द्याचे जबरदस्त भांडवल केले. एवढेच नही, तर राजस्थान सरकारमधील बरखास्त मंत्री राजेंद्र गुढा यांनी, या याडरीत आमदारांच्या घोडेबाजारीचा संपूर्ण कच्छा-चिठ्ठा असण्याचाही दावा केला  होता. यासंदर्भात बोलताना, "लाल डायरीची पानं जसजशी खुली होत आहेत, तस-तशी जादूगराची चिंता वाढत आहे. काँग्रेस सरकारने पाच वर्षांत आपले पाणी, जंगल आणि जमीन कशी विकली? राज्यातील अवैध खाण कामाचे कनेक्शन कुणापर्यंत पोहोचले आहे? हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गटबाजी -याशिवाय राजस्थानात गटबाजीही बघायला मिळाली. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद कुणापासूनही लपलेला नाही. याचा परिमाण राज्यातील पक्षाच्या कार्यकत्यांवर तर झालाच, पण जनतेतही चुकीचा संदेश गेला. खरे तर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दोघांमध्येही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यात सर्व काही सुरळित आहे आम्ही सोबत आहोत, असा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. मात्र याचा परिणाम निवडणूक निकालावर होताना दिसला नाही.

कन्हैयालाल हत्याकांड -राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलला आणि गेहलोत सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरे तर, राज्य जिंकायचे असेल, तर सर्वप्रथम मेवाड जिंकावे लागते, असे बोलले जाते आणि याच मारवाडमध्ये उदयपूर येते. भाजपने टाकलेल्या कन्हैया कुमार हत्या प्रकरणाच्या या ट्रॅपमध्ये अशोक गेहलोतही पुरते अडकले.

पेपर लिक प्रकरण आणि ईडीची एंट्री -पाच राज्यांत निवडणुका होत असताना दोन राज्यांमध्ये ईडीची एन्ट्रीही झाली. राजस्थानात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरावर पेपर लीक प्रकरणात ईडीने छापा टाकला. निवडणूक प्रचारात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला. अशोक गेहलोत यांनी प्रत्येक पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र याचा फायदा भाजपलाच मिळताना दिसला. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक