शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवलंय जातंय; ममता कुलकर्णीवर बाबा रामदेव संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:09 IST

अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला असून, आता त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत.

Baba Ramdev on Mamata Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, आरामयादी आयुष्य सोडून ममताने संन्यास घेतला आहे. 24 वर्षांपासून बॉलिवूड आणि भारतापासून दूर असलेली ममता अचानक भारतात परतली आणि महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. यामुळे आता तिच्यावर सातत्याने टीका होत आहे. एका दिवसात कोणी संत होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यात रील्स बनवण्याच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अश्लिलतेबद्दल नाराजी व्यक्त केली. यासोबतच कोणीही एका दिवसात संत होऊ शकत नाही, यासाठी अनेक वर्षांची साधना करावी लागते, असेही म्हटले आहे. त्यांचा हा टोला अभिनेत्री ममता कुलकर्णीवर होता.

बाबा रामदेव म्हणतात, अचानक काहीजण महामंडलेश्वर झाले आहेत. नावापुढे 'बाबा' जोडल्याने कोणी लगेच साधू-संत होत नाही. रील्सच्या नावाखाली चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे योग्य नाही. खरे कुंभ ते आहे, जिथे मानवतेपासून देवत्व, ऋषीत्व आणि ब्रह्मत्वाकडे आरोहण होते. स्नान, ध्यान, योगाभ्यास, सत्य, प्रेम आणि करुणा, ध्यान योग, भक्ती योग, कर्मयोग, ही योगाची त्रिवेणी आहे. एक म्हणजे शाश्वत अनुभवणे, शाश्वत जगणे आणि शाश्वतचा विस्तार करणे. सनातनच्या नावाने फक्त काही ठराविक शब्द बोलणे म्हणजे सनातन नव्हे. सनातन हे शाश्वत सत्य आहे जे कधीही नाकारता येत नाही.

यावेळी त्यांना ममता कुलकर्णीबाबत विचारले असता बाबा रामदेव म्हणाले, कोणीही एका दिवसात संतपद प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे सराव करावा लागतो. आज स्वामी रामदेवही तुमच्यासमोर उभे आहेत. हे संतपद मिळवण्यासाठी आम्हाला 50-50 वर्षांची तपश्चर्या लागली. याला संतत्व म्हणतात. संत होणे ही मोठी गोष्ट आहे. महामंडलेश्वर हे फार मोठे पद आहे. आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवले जात आहे, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले ?कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाखाली येऊन कोणाला संत किंवा महामंडलेश्वर कसे बनवता येईल? अजून मीदेखील महामंडलेश्वर झालो नाही. यापूर्वी ट्रान्सजेंडर कथाकार जगतगुरु हिमांगी सखी यांनीही ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. एएनआयला दिलेल्या निवेदनात त्या म्हणाल्या की, किन्नर आखाड्याने हे केवळ प्रसिद्धीसाठी केले आहे. तिचा भूतकाळ समाजाला चांगलाच ठाऊक आहे. अचानक ती भारतात येते आणि महाकुंभला हजेरी लावते आणि तिला महामंडलेश्वर पद दिले जाते. याची चौकशी झाली पाहिजे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश