शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

'ही' आहेत देशातील टॉप-10 प्रदूषिक शहरे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सर्वात खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:07 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सर्व प्रयत्न करूनही प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी झाले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करुनही दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. देशातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये हरियाणातील पाच आणि उत्तर प्रदेशमधील चार शहरांचा समावेश आहे.

दिल्लीची हवा आणखी खराबदिल्लीची हवा सुधारण्यासाठी करण्यात येणारे सर्व प्रयत्न अपुरे ठरत आहेत. आज सकाळी दिल्लीतील हवेचा AQI म्हणजेच गुणवत्ता निर्देशांक 411 वर नोंदवला गेला. दिल्लीची हवा गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. दुसरीकडे, दिल्लीची AQI पातळी एका दिवसापूर्वी 397 होती आणि हवा कमी विषारी होती. पण, फक्त एकाच दिवसात AQI 411 वर गेल्याने चिंता वाढली आहे.

टॉप 10 प्रदूषित शहरेदेशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये फरिदाबाद(396) दुसऱ्या, बहादुरगड (390) तिसऱ्या, हिस्सार (388) चौथ्या आणि गुरुग्राम (387) पाचव्या क्रमांकावर आहे. यासह गाझियाबाद (372), नोएडा (370), बुलंदशहर (368), ग्रेटर नोएडा (360) आणि जिंद (360) यांचा अनुक्रमे टॉप-10 मध्ये समावेश आहे. आज सकाळी गंभीर श्रेणीत पोहोचणारे दिल्ली हे देशातील एकमेव शहर बनले आहे. याशिवाय देशातील 23 शहरे अशी होती ज्यांचा AQI 'अत्यंत खराब' म्हणून नोंदवला गेला आहे.

काय आहे AQIहवेची गुणवत्ता AQI(Air Quality Index)मध्ये मोजली जाते. 0 ते 50 AQI असल्याच हवेची गुणवत्ता चांगली असते. यानंतर, 51-100 समाधानकारक, 101-200 मध्यम, 201-300 खराब आणि 301-400 अत्यंत खराब मानली जाते. तर, 401-500 ची श्रेणी अंत्यत गंभीर मानली जाते. हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत असल्यास त्या शहरातील नागरिकांवर गंभीर परिणाम पडू शकतो.

प्रदूषणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका स्वीकारल्यानंतर दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर अनेक निर्णय घेण्यात आले होते. प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी बांधकामाशी संबंधित सर्व कामांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. तसेच, प्लंबर, अंतर्गत सजावट, इलेक्ट्रिशियनचे काम यांसारखी प्रदूषणविरहित कामे थांबवू नयेत, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, जितके दिवस काम बंद असेल तितके दिवस बांधकाम कामगारांसाठी तयार केलेल्या निधीतून राज्य सरकारे या मजुरांना पैसे देतील. याशिवाय प्रदूषणाशी संबंधित इतर अनेक बाबींवरही सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तरे मागवली होती.

टॅग्स :delhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय