शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'ही' आहेत देशातील टॉप-10 प्रदूषिक शहरे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सर्वात खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:07 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सर्व प्रयत्न करूनही प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी झाले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करुनही दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. देशातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये हरियाणातील पाच आणि उत्तर प्रदेशमधील चार शहरांचा समावेश आहे.

दिल्लीची हवा आणखी खराबदिल्लीची हवा सुधारण्यासाठी करण्यात येणारे सर्व प्रयत्न अपुरे ठरत आहेत. आज सकाळी दिल्लीतील हवेचा AQI म्हणजेच गुणवत्ता निर्देशांक 411 वर नोंदवला गेला. दिल्लीची हवा गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. दुसरीकडे, दिल्लीची AQI पातळी एका दिवसापूर्वी 397 होती आणि हवा कमी विषारी होती. पण, फक्त एकाच दिवसात AQI 411 वर गेल्याने चिंता वाढली आहे.

टॉप 10 प्रदूषित शहरेदेशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये फरिदाबाद(396) दुसऱ्या, बहादुरगड (390) तिसऱ्या, हिस्सार (388) चौथ्या आणि गुरुग्राम (387) पाचव्या क्रमांकावर आहे. यासह गाझियाबाद (372), नोएडा (370), बुलंदशहर (368), ग्रेटर नोएडा (360) आणि जिंद (360) यांचा अनुक्रमे टॉप-10 मध्ये समावेश आहे. आज सकाळी गंभीर श्रेणीत पोहोचणारे दिल्ली हे देशातील एकमेव शहर बनले आहे. याशिवाय देशातील 23 शहरे अशी होती ज्यांचा AQI 'अत्यंत खराब' म्हणून नोंदवला गेला आहे.

काय आहे AQIहवेची गुणवत्ता AQI(Air Quality Index)मध्ये मोजली जाते. 0 ते 50 AQI असल्याच हवेची गुणवत्ता चांगली असते. यानंतर, 51-100 समाधानकारक, 101-200 मध्यम, 201-300 खराब आणि 301-400 अत्यंत खराब मानली जाते. तर, 401-500 ची श्रेणी अंत्यत गंभीर मानली जाते. हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत असल्यास त्या शहरातील नागरिकांवर गंभीर परिणाम पडू शकतो.

प्रदूषणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका स्वीकारल्यानंतर दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर अनेक निर्णय घेण्यात आले होते. प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी बांधकामाशी संबंधित सर्व कामांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. तसेच, प्लंबर, अंतर्गत सजावट, इलेक्ट्रिशियनचे काम यांसारखी प्रदूषणविरहित कामे थांबवू नयेत, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, जितके दिवस काम बंद असेल तितके दिवस बांधकाम कामगारांसाठी तयार केलेल्या निधीतून राज्य सरकारे या मजुरांना पैसे देतील. याशिवाय प्रदूषणाशी संबंधित इतर अनेक बाबींवरही सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तरे मागवली होती.

टॅग्स :delhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय