मोटार वाहन कायद्यात मोठे बदल होणार, नितीन गडकरी यांची माहिती; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:49 AM2022-02-11T11:49:32+5:302022-02-11T11:51:01+5:30

वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते. 

There will be major changes in motor vehicle laws; says Nitin Gadkari | मोटार वाहन कायद्यात मोठे बदल होणार, नितीन गडकरी यांची माहिती; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

मोटार वाहन कायद्यात मोठे बदल होणार, नितीन गडकरी यांची माहिती; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

Next

नवी दिल्ली : वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना दिली.

वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते. 

कायद्यातील प्रमुख बदल -
-    मोटर गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य
-    आठ आसनी वाहनापर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग सक्तीचे राहील.
-    सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार मानांकन दिले जाईल.
-    वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण आणणार.  
-    सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली राहील.
-    दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये बदल केले जातील.
-    चालकाला डुलकी येत असल्यास वाहनातील अलार्म सुरू होईल.
-    नियमित अपघात होणाऱ्या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सूचना दिली जाईल.
 

Web Title: There will be major changes in motor vehicle laws; says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.