शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

"महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून..."; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:09 IST

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं.

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर त्रिवेणी संगमावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र तिथे चेंगराचेंगरी झाली नाही तर गर्दी जास्त असल्याने काही भाविक जखमी झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

मौनी अमावस्येच्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता पवित्र स्थानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजमध्ये आले होते. सर्व भाविक त्रिवेणी संगमाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी एकाच वेळी गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेनेही शाही स्नान रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर संतांनी दुपारी शाही स्नान करण्याची घोषणा केली. गर्दीमुळे संगम काठावरील चेंजिंग रूमचे गेट अंगावर पडल्याने चेंगराचेंगरी झाली अशी माहिती सुरुवातीला पोलिसांनी दिली. त्यानतंर आता तिथे चेंगराचेंगरी झाली नसल्याचे  वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी म्हटलं.

"तिथं चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नये. अमृत स्नान लवकरच सुरू होईल. अमृत स्नानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्व घाटांवर तयारी केली गेली आहे आणि लोक त्या घाटांवर सहज स्नान करू शकतात. माझ्याकडे मृतांची किंवा जखमींची संख्या नाही. जिल्हा पोलिसांकडून याबाबत माहिती मिळू शकेल. सध्या मी इथली व्यवस्था पाहत आहे. आम्हाला लोकांची व्यवस्था पाहायची आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिली.

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून महाकुंभाच्या व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आहेत.

पुण्यवानांना गमवावे लागले - पंतप्रधान मोदी

"महाकुंभात झालेल्या दुर्घटनेत काही पुण्यवानांना गमवावे लागले. अनेकांना दुखापतही झाली आहे. मी पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी उत्तर प्रदेश सरकारच्या सतत संपर्कात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश