शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

नियंत्रण रेषेवर झाला नाही गोळीबार, भारतीय जवानांवर हल्ल्यासाठी चिन्यांनी वापरले हे हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 17:36 IST

गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देचीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. त्यांच्याकडे लोखंडी नाल आणि खिळे असलेल्या काठ्यांनी हल्ला केलाया झटापटीत जे अधिकारी बैठकीचे नेतृत्व करत होते त्यांना गंभीर जखमा झाल्याया झटापटीत भारताचे १० ते १२ जवान जखमी झाले आहेत. तर चीनचेसुद्धा एवढेच जवान गंभीर जखमी झाले

लेह (लडाख) - लडाखमधील गलवान घाटी परिसरातील गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये उडालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर चीनचे पाच सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जेव्हा बॉर्डर कमांडर पातळीवर बैठक झाली तेव्हा पीपी१४-१५-१७ येथे चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाईल असे निश्चित झाले. मात्र चीनी सैनिकांनी हे मान्य करण्यास नकार दिला. भारताच्या बाजूने त्यांना वारंवार समजावून सांगण्यात आले. मात्र चीनी सैनिकांनी हल्ला केला. 

चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. त्यांच्याकडे लोखंडी नाल आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. या झटापटीत जे अधिकारी बैठकीचे नेतृत्व करत होते त्यांना गंभीर जखमा झाल्या. या झटापटीत भारताचे १० ते १२ जवान जखमी झाले आहेत. तर चीनचेसुद्धा एवढेच जवान गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याबाबत लष्कराकडून अधिकृत माहिती आलेली नाही. 

मात्र या झटापटीनंतर चीनने भारतावरच उलटा आरोप केला आहे. भारताकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. आता भारताने कुठली एकतर्फी कारवाई करू नये, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

सीमेवरची ती चकमक ज्यात भारतीय लष्कराने चीनला दिला होता धोबीपछाड

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान खोऱ्यात सोमवारी डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. या झटापटीत लष्कराच्या एक अधिकारी आणि दोन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बैठक घेत आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन