शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला

ठळक मुद्देमोदींनी माफी मागावी यासाठी संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातलाकाँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये'

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. काँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर झालेला पहायला मिळाला. 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये. सभागृहात काहीही झालेलं नाही. ते वक्तव्य सभागृहात केलेलं नव्हतं', असं वैंकय्या नायडू म्हणाले आहे.  

विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलं होतं. सुरुवातीला शून्य प्रहर सुरु असताना विरोधक वेलमध्ये उतरले आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर कामकाज स्थगित करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला. 

याआधी काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्यी टीकेप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती. डॉ मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिका-यांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ मनमोहन सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ मनमोहन सिंग म्हणाले होते. 

विरोधक गरादोळ घालत असताना वैंकय्या नायडू वारंवार शांत राहण्याची विनंती करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य संसद परिसरात करण्यात आलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही असं वैकय्या नायडू म्हणाले. 'ही संसद आहे. ही राज्यसभा आहे. शून्य प्रहर रद्द करण्याची प्रथा नाहीये. सभगृहाचा अपमान करु नका. चुकीचा संदेश जात आहे', असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगRajya Sabhaराज्यसभा