शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला

ठळक मुद्देमोदींनी माफी मागावी यासाठी संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातलाकाँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये'

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. काँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर झालेला पहायला मिळाला. 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये. सभागृहात काहीही झालेलं नाही. ते वक्तव्य सभागृहात केलेलं नव्हतं', असं वैंकय्या नायडू म्हणाले आहे.  

विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलं होतं. सुरुवातीला शून्य प्रहर सुरु असताना विरोधक वेलमध्ये उतरले आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर कामकाज स्थगित करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला. 

याआधी काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्यी टीकेप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती. डॉ मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिका-यांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ मनमोहन सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ मनमोहन सिंग म्हणाले होते. 

विरोधक गरादोळ घालत असताना वैंकय्या नायडू वारंवार शांत राहण्याची विनंती करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य संसद परिसरात करण्यात आलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही असं वैकय्या नायडू म्हणाले. 'ही संसद आहे. ही राज्यसभा आहे. शून्य प्रहर रद्द करण्याची प्रथा नाहीये. सभगृहाचा अपमान करु नका. चुकीचा संदेश जात आहे', असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगRajya Sabhaराज्यसभा