शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला

ठळक मुद्देमोदींनी माफी मागावी यासाठी संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातलाकाँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये'

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. काँग्रेस खासदार सतत गदारोळ घालत असल्याने राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांचा संताप अनावर झालेला पहायला मिळाला. 'ही अत्यंत चुकीची पद्दत आहे. कोणीही माफी मागणार नाहीये. सभागृहात काहीही झालेलं नाही. ते वक्तव्य सभागृहात केलेलं नव्हतं', असं वैंकय्या नायडू म्हणाले आहे.  

विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलं होतं. सुरुवातीला शून्य प्रहर सुरु असताना विरोधक वेलमध्ये उतरले आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर कामकाज स्थगित करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला. 

याआधी काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्यी टीकेप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती. डॉ मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिका-यांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ मनमोहन सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ मनमोहन सिंग म्हणाले होते. 

विरोधक गरादोळ घालत असताना वैंकय्या नायडू वारंवार शांत राहण्याची विनंती करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य संसद परिसरात करण्यात आलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही असं वैकय्या नायडू म्हणाले. 'ही संसद आहे. ही राज्यसभा आहे. शून्य प्रहर रद्द करण्याची प्रथा नाहीये. सभगृहाचा अपमान करु नका. चुकीचा संदेश जात आहे', असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगRajya Sabhaराज्यसभा