शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी-शरीफ यांची बैठक नाहीच

By admin | Updated: November 27, 2014 02:41 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले.

काठमांडू : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
या दोन्ही पंतप्रधानांची बैठक आयोजित करण्याची आमची योजना नाही कारण पाकिस्तानकडून तशी विनंती करण्यात आलेली नाही, असे अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
सार्क परिषदेसाठी आलेल्या राष्ट्र प्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार आहेत, पण त्यात पाकिस्तानचा समावेश नाही. इतर नेत्यांच्या बैठकीत होणा:या वाटाघाटींची माहिती आम्ही देऊ, असे अकबरुद्दीन म्हणाले. मोदी यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत शरीफ यांच्या भेटीचा उल्लेख नाही. अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश व भूतान  यांच्या नेत्यांशी भारताचे पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. 
बिझनेस व्हिसा 
भारत सार्क देशांना 3-5 वर्षाचा बिझनेस व्हिसा देईल, तसेच सार्क व्यापारी प्रवासी कार्डही जारी केले जाईल, यामुळे भारतात प्रवेश करणो सोपे होईल. दक्षिण आशिया हा समृद्ध लोकशाहीचा प्रदेश असून आपला वारसाही समृद्ध आहे.  युवापिढीची शक्ती, बदल व प्रगतीची इच्छा हे आपले सामथ्र्य आहे. मी भविष्यातील भारताची स्वप्ने पाहतो व हा संपूर्ण परिसर समृद्ध व्हावा, अशी आशा करतो, असे मोदी म्हणाले. 
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सार्क नेत्यांचे आभार मानले. आपल्या परराष्ट्र दौ:याचे अनुभव सांगितले. (वृत्तसंस्था)
 
मोदी - शरीफ यांच्यात दुरावा
4काठमांडू- ते एकाच व्यासपीठावर होते, पण त्यानी हस्तांदोलनही केले नाही. सार्क परिषदेच्या पहिल्या दिवशी तीन तास कार्यक्रम चालले होते, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात दुरावाच होता. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीपासून दोन आसने पलीकडे नवाज शरीफ बसले होते. पण त्यानी एकमेकाकडे पाहिलेही नाही. मधल्या आसनावर मालदीव व नेपाळचे नेते बसले होते. 
4मोदी व शरीफ यांच्यात बैठक ठरलेली नव्हती. पण दोघानी हास्यविनोदही करु नयेत असेकाही ठरले नव्हते. आज आणि उद्या गुरुवारीही दोघांना एकाच व्यासपीठावर बसायचे आहे. तसेच रिट्रिट कार्यक्रमातही सहभाग नोंदवायचा आहे. मंगळवारी शरीफ यांनी भारत-पाक वाटाघाटी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताने द्यावे असे म्हटले होते.  भारताने पाकबरोबर वाटाघाटी होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.