शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

Tripura Violence: त्रिपुरात काहीच घडलं नाही, सोशल मीडियावर चुकीच्या अफवा; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 23:23 IST

महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.

नवी दिल्ली – गेल्या २ दिवसांपासून त्रिपुरा घटनेवरुन महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये हिंसक आंदोलन आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता या प्रकारावर केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्रिपुरामध्ये मस्जिदीला कुठल्याही प्रकारे नुकसान अथवा तोडफोड झाली नाही. सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बातम्या चुकीच्या आणि बनावट आहेत. सोशल मीडियावरुन लोकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले आहे की, अलीकडे त्रिपुरामध्ये कुठलीही मस्जिद बांधकामाला नुकसान पोहचलं नाही. असा प्रकार समोर आला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मस्जिद पाडण्यात आल्याचं सांगितले. ही अफवा आणि चुकीची माहिती आहे. काकराबनच्या दरगाबाजार परिसरात मस्जिदीला नुकसान झालं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता ठेवण्याचं काम करत आहे असं त्यांनी सांगितले.

 

तसेच महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले. हे खूप चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता राखायला हवी असं गृह मंत्रालायाने आग्रही सूचना केली आहे. महाराष्ट्रात अमरावतीसह नांदेड, मालेगाव ५ शहरात तोडफोड आणि दंगलसदृश परिस्थिती बनली आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला असून दंगल पसरवण्याविरोधात कारवाई केली जात आहे. CCTV फुटेजच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मालेगावात हिंसक आंदोलन करणाऱ्या १८ जणांना अटक केली आहे. तर नांदेडमध्ये ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अमरावतीत आतापर्यंत १० जणांना पकडलं आहे. अमरावती कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

वाहने जाळली, दुकान, गॅरेजला लावली आग

बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने शनिवारी उघडलीच नाही. नमुना भागात कार जाळण्यात आली, तर ऑटोगल्ली व हमालपुरा भागातील मोटर गॅरेजमधील चार दुचाकी जाळण्यात आल्या.

टॅग्स :Tripuraत्रिपुराHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्र