शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींवर चार आण्याच्याही घोटाळ्याचा आरोप नाही"; ED च्या प्रश्नावर अमित शाह यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:27 IST

प. बंगालमधील संदेशखालीमध्ये तपास यंत्रणांवर हल्ला करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांवर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर हा गंभीर मुद्दा आहे.

नवी दिल्ली - देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईला विरोधकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. भाजपाने केवळ आकसापोटी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं असून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काहींना लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवाईला विरोधही केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अद्यापही ईडीच्या चौकशीला न जाता विरोध केला. तर, ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील प. बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. तसेच, ह्या कारवाया देशातील भ्रष्टाचाराल उघडं पाडत असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

प. बंगालमधील संदेशखालीमध्ये तपास यंत्रणांवर हल्ला करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांवर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. कारण, राज्य आणि केंद्रीय संस्थांमधील वाद वाढत असल्याच्या संदर्भाने गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अमित शाह यांनी ही समस्या गंभीर वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह यांनी देशातील केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या धाडीवरुन भाष्य करताना, विरोधकांना आणि प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य केलं. 

लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तर जनता देत असते. पश्चिम बंगालमध्ये ५२ कोटी एकत्र सापडतात. झारखंडमध्ये ३५५ कोटी रुपये रोकड आढळून येते. पैसे मोजता, मोजता मशिन्स गरम होतात. तरीही हे सर्वजण म्हणतात, आमच्यावर कारवाई करू नका. युपीए सरकारविरुद्ध ४० केस फक्त युपीएला दाखल करावे लागले. आम्ही विरोधात होतो, संसदेत प्रश्न उपस्थित करत होतो, पीआयएल करत होतो, तेव्हा कोर्टाच्या आदेशानंतर तपास केला जात होता. त्यावेळी, तुम्हीच सत्तेत होतात, या देशात न्यायालये आहेत. जर, कोणावर अन्याय होत असेल तर न्यायालयात जावा. मात्र, १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे लोक तपासाला घाबरतात. म्हणूनच, ते असं वातावरण तयार करतात. 

१२ लाख कोटींच्या घोटाळ्यांचा तपास आज आपल्यासमोर होत आहे. दुसरीकडे २३ वर्षांपासून नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पंतप्रधान राहिले आहेत. गेल्या १० वर्षांपासून देशात आमचं सरकार आहे. पण, चाराण्याच्या घोटाळ्याचा देखील आरोप विरोधक नरेंद्र मोदींवर लावू शकले नाहीत, असे म्हणत अमित शाह यांनी ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले. तसेच, आम्ही पारदर्शकपणे सरकार चालवलं, सध्याच्या कारवाईतून हे सगळे उघड पडत आहेत. संदेशखाली येथील घटनांनी प. बंगालमधील सरकारला १०० टक्के उघडं पाडलं आहे, महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात धर्माच्या आधारे महिलांचं शोषण होत आहे, ते सहन केलंच जाऊ शकत नाही. आम्ही जोर लावून इथे लढाई लढू आणि प. बंगालमध्ये परिवर्तन घडवू, असेही शाह यांनी कडक शब्दात सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय