शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:29 IST

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले.

नवी दिल्ली-

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले. आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी काही निर्णय चुकीचे ठरले असतीलही पण पंतप्रधान मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजवर झालेला नाही. सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे.

केंद्र सरकारनं घेतलेले काही निर्णय चुकीचे असतीलही पण आमचा हेचू अजिबात चुकीचा नव्हता. त्यावर कुणीही शंका उपस्थित करू शकत नाही, असं अमित शाह म्हणाले. "देशात गेल्या सात वर्षांमध्ये बराच बदल झालेला आहे यावर माझे विरोधकही सहमत होतील. आमच्या सरकारवर आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आमचे काही निर्णय चुकीच ठरले असतीलही पण आमचा हेतू चुकीचा होता असं कुणीही सांगू शकत नाही", असं अमित शाह म्हणाले. 

अमित शाह यांनी यावेळी यूपीएवरही निशाणा साधला. देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण मोदींची सत्ता येताच लोकशाही मजबूत झाली. देशात बहुपक्षीय लोकशाही यंत्रणा जवळपास कोलमडून पडण्याच्या पायरीवर होती. पण मोदी सरकारनं देशातील नागरिकांच्या मनात विश्वास प्राप्त केला आणि लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. 

उत्तर प्रदेशात प्रचार रॅलीअमित शाह यांच्या उपस्थितीत आज लखनऊ येथे "सरकार बनाओ, अधिकार पाओ'' या बोधवाक्याखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संजय निषाद आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह देखील सहभागी होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाय मौर्य आणि दिनेश शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा