शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 7:06 PM

राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा योगींचा दावा

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात एकही दंगल न झाल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. योगींनी एकापाठोपाठ एक असे सात ट्विट करून आपल्या 21 महिन्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करत स्वत:ची पाठ थोपटली आहे. राज्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणल्याचा दावादेखील त्यांनी केला. माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल झाली नाही. गेल्या 2 वर्षात राज्यात कायद्याचं राज्य आलं, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केला. 'माझ्या कारकिर्दीत लोकांचा उत्तर प्रदेशबद्दलचा दृष्टीकोन बदलला. उत्तर प्रदेश म्हणजे भ्रष्टाचार, अराजकता आणि दंगली असा लोकांचा समज होता. फक्त देशातीलच नव्हे, तर परदेशातील लोकांचा उत्तर प्रदेशकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नव्हता. मात्र आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे,' असं योगींनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं. यानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीचं कौतुक केलं. मार्चमध्ये माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण होतील. या काळात एकदी दंगल झालेली नाही, असा दावा योगींनी केला. महिन्याभरापूर्वी गोहत्येच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात एका पोलीस अधिकाऱ्याची जमावानं हत्या केली होती. याशिवाय अनेक ठिकाणी तथाकथित गोरक्षकांनी धुमाकूळ घातला. यावरुन विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा बसल्याचा दावा योगींनी केला. 'आम्ही संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. कौटुंबिक वाद सोडले तर उत्तर प्रदेश पूर्णपणे सुरक्षित आहे,' असं योगींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश