शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:03 IST

Delhi Mumbai expressway toll charges: वार्षिक पासमुळे प्रवाशी फक्त तीस रुपये देऊन दिल्लीहून मुंबईला पोहोचू शकतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच वार्षिक टोल पास योजना जाहीर केली आहे.

- चंद्रशेखर बर्वे, सवाई माधोपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली वार्षिक टोल पास योजना खासगी वाहन चालकांना मालामाल करून सोडणारी आहे. वार्षिक पासमुळे प्रवाशी फक्त तीस रुपये देऊन दिल्लीहूनमुंबईला पोहोचू शकतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच वार्षिक टोल पास योजना जाहीर केली आहे. या पासचा उपयोग करून फक्त ३० रुपयाचा टोल टॅक्स भरून दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास केला जाऊ शकतो. तीन हजार रुपयाचा वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येईल. यानुसार, एका टोलवर फक्त १५ रुपये शुल्क आकारले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षाच्या शेवटपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे तयार होईल. 

या महामार्गाहून दिल्ली ते मुंबई १३८६ किमीचा प्रवास अवघ्या बारा तासात पूर्ण होणार आहे. हा एक्स्प्रेस वे पूर्णपणे प्रवेश नियंत्रित आहे. अशात दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या चालकांना पहिला टोल दिल्लीत प्रवेशाच्यावेळी आणि मुंबईत दुसरा टोल प्लाझा ओलांडावा लागेल.

सध्या किती लागतो टोल?

नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिल्ली आणि मुंबई या दोन टोल प्लाझावर प्रती १५ रुपयाप्रमाणे ३० रुपयाचा टोल द्यावा लागेल. अशाप्रकारे दिल्ली ते मुंबईचा प्रवास फक्त ३० रुपयाचा टोल भरून करता येईल.

सध्या, एका गाडीला दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान जवळपास २१०० रुपयाचा टोल टॅक्स भरावा लागतो. १३८६ किमी लांबीच्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी १५ टोल प्लाझा प्रस्तावित असून ते प्रवेश नियंत्रित आहे.

अधिकारी काय म्हणतात?

हा एक्सप्रेसवे मुंबईपर्यंत तयार झालेला नाही. २० टक्के काम प्रलंबित आहे. पुढील वर्षापर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर फक्त दोन टोल प्लाझा लागतील. परंतु, वार्षिक टोल पास दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर चालणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. 

यावर वार्षिक पास लागू होणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, असे महामार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाMumbaiमुंबईdelhiदिल्लीhighwayमहामार्ग