शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:26 IST

खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीतील नव्या संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा घुसकोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, देशाच्या संसद भवनातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज संसदेत याप्रकरणावरुन गदारोळ होत असून खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी संसदेतील घटनेवर भाष्य् करताना यापूर्वी देशाच्या सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. तर, आता गृहमंत्र्यांनी अद्याप का स्पष्टीकरण दिलं नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांसह यामागील मास्टरमाईंडलाही पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. याप्रकरणी, आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. 

संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप भाष्य केलं नाही. त्यामुळे, विरोधक आक्रमक झाले आहेत. खा. संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ''संसदेतील घुसखोरीच्या प्रकरणावेळी आजमित्तीस दिल्लीत जर इतर कोणाचं सरकार असते, तर भाजपावाल्यांनी दिल्ली बंद केली असती. पण, तुमच्या खासदाराने लोकांना संसदेत घुसण्याची संधी दिली, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दिल्लीतील संसद भवनाच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीपणावर भाष्य केलं. तसेच, याप्रकरणी राजकारण होता कामा नये, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मात्र, याबाबत अद्याप गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण किंवा विधानही आलं नाही. पण, त्यांनी ससंदेत यायला हवं, घटनेवर भाष्य तरी करायला हवं. यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. जे घडलंय ते घडलंय, पुढे होणार नाही, हे तरी सांगावं,'' असे म्हणत संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर आणि भाजपावर निशाणा साधला. 

यापूर्वी सीमारेषेवरील सुरक्षेवरही उपस्थित केले प्रश्न

देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला. 

देशाच्या संसदेची सुरक्षा, जिथे चोख बंदोबस्त असतो. त्या संसदेत काही मुलं घुसली, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती ते ठिक. पण, सभागृहात त्यांनी उड्या मारल्या, गोंधळ निर्माण झाला. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत, हे सरकार गेल्या महिनाभरापासून निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे, शपथग्रहणमध्ये व्यस्त आहे आणि देशाची सुरक्षा हवेत आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदdelhiदिल्लीSanjay Rautसंजय राऊत