शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:26 IST

खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीतील नव्या संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा घुसकोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, देशाच्या संसद भवनातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज संसदेत याप्रकरणावरुन गदारोळ होत असून खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे. 

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी संसदेतील घटनेवर भाष्य् करताना यापूर्वी देशाच्या सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. तर, आता गृहमंत्र्यांनी अद्याप का स्पष्टीकरण दिलं नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांसह यामागील मास्टरमाईंडलाही पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. याप्रकरणी, आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. 

संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप भाष्य केलं नाही. त्यामुळे, विरोधक आक्रमक झाले आहेत. खा. संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ''संसदेतील घुसखोरीच्या प्रकरणावेळी आजमित्तीस दिल्लीत जर इतर कोणाचं सरकार असते, तर भाजपावाल्यांनी दिल्ली बंद केली असती. पण, तुमच्या खासदाराने लोकांना संसदेत घुसण्याची संधी दिली, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दिल्लीतील संसद भवनाच्या सुरक्षेत झालेल्या निष्काळजीपणावर भाष्य केलं. तसेच, याप्रकरणी राजकारण होता कामा नये, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मात्र, याबाबत अद्याप गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण किंवा विधानही आलं नाही. पण, त्यांनी ससंदेत यायला हवं, घटनेवर भाष्य तरी करायला हवं. यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. जे घडलंय ते घडलंय, पुढे होणार नाही, हे तरी सांगावं,'' असे म्हणत संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर आणि भाजपावर निशाणा साधला. 

यापूर्वी सीमारेषेवरील सुरक्षेवरही उपस्थित केले प्रश्न

देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला. 

देशाच्या संसदेची सुरक्षा, जिथे चोख बंदोबस्त असतो. त्या संसदेत काही मुलं घुसली, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती ते ठिक. पण, सभागृहात त्यांनी उड्या मारल्या, गोंधळ निर्माण झाला. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत, हे सरकार गेल्या महिनाभरापासून निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे, शपथग्रहणमध्ये व्यस्त आहे आणि देशाची सुरक्षा हवेत आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदdelhiदिल्लीSanjay Rautसंजय राऊत