शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:14 IST

Delhi Crime News: दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हे तिहेरी हत्याकांड समोर आल्यानंतर बचावलेल्या मुलाने सांगितले होते की, मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. त्यादरम्यान, कुणीतरी घरात घुसून कुटुंबीयांची हत्या केली. मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा घरात कुणीच घुसलं नसल्याचं समोर आलं. त्याशिवाय घराच्या मेन गेटला लागलेलं कुलूप कुणी तोडलं नसल्याचं तसेच त्या कुलुपासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली नव्हती, अशी माहिती तपासामधून समोर आली. त्यानंतर पोलिसांना या हत्याकांडात बचावलेला मुलगा अर्जुन याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. 

आरोपी अर्जुन याने पोलिस चौकशीमध्ये सांगितले की, माझे वडील अभ्यासावरून रागवायचे. मात्र माझं अभ्यासावर मन लागत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला घराबाहेर अनेक लोकांसमोर ओरडून मारहाण केली होती. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. एवढंच नाही तर घरातही मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. घरामध्ये माझी आई आणि बहिण मला सपोर्ट करत नव्हती. याचदरम्यान, माझे वडील सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार असल्याचं मला कळलं. त्यामुळे नाराज होऊन मी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आरोपी अर्जुन याने बुधवारी सकाळी घरात ठेवलेला चाकू उचलला आणि तिघांचीही गळा कापून हत्या केली. या हत्याकांडामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं असलेलं कुटुंब आता त्यांच्यामध्ये नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नाही आहे. 

बुधवारी दिल्लीतील नेबसरायमधील देबली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांची ओळख राजेश कुमार, कोमल आणि मुलगी कविता अशी पटली होती.   मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे तिहेरी हत्याकांड समोर आल्यानंतर बचावलेल्या मुलाने सांगितले होते की, मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. त्यादरम्यान, कुणीतरी घरात घुसून कुटुंबीयांची हत्या केली. मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा घरात कुणीच घुसलं नसल्याचं समोर आलं. त्याशिवाय घराच्या मेन गेटला लागलेलं कुलूप कुणी तोडलं नसल्याचं तसेच त्या कुलुपासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली नव्हती, अशी माहिती तपासामधून समोर आली. त्यानंतर पोलिसांना या हत्याकांडात बचावलेला मुलगा अर्जुन याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी अर्जुन याने पोलिस चौकशीमध्ये सांगितले की, माझे वडील अभ्यासावरून रागवायचे. मात्र माझं अभ्यासावर मन लागत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला घराबाहेर अनेक लोकांसमोर ओरडून मारहाण केली होती. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. एवढंच नाही तर घरातही मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. घरामध्ये माझी आई आणि बहिण मला सपोर्ट करत नव्हती. याचदरम्यान, माझे वडील सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार असल्याचं मला कळलं. त्यामुळे नाराज होऊन मी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपी अर्जुन याने बुधवारी सकाळी घरात ठेवलेला चाकू उचलला आणि तिघांचीही गळा कापून हत्या केली. या हत्याकांडामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं असलेलं कुटुंब आता त्यांच्यामध्ये नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नाही आहे. बुधवारी दिल्लीतील नेबसरायमधील देबली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांची ओळख राजेश कुमार, कोमल आणि मुलगी कविता अशी पटली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीFamilyपरिवार