शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:14 IST

Delhi Crime News: दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हे तिहेरी हत्याकांड समोर आल्यानंतर बचावलेल्या मुलाने सांगितले होते की, मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. त्यादरम्यान, कुणीतरी घरात घुसून कुटुंबीयांची हत्या केली. मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा घरात कुणीच घुसलं नसल्याचं समोर आलं. त्याशिवाय घराच्या मेन गेटला लागलेलं कुलूप कुणी तोडलं नसल्याचं तसेच त्या कुलुपासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली नव्हती, अशी माहिती तपासामधून समोर आली. त्यानंतर पोलिसांना या हत्याकांडात बचावलेला मुलगा अर्जुन याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. 

आरोपी अर्जुन याने पोलिस चौकशीमध्ये सांगितले की, माझे वडील अभ्यासावरून रागवायचे. मात्र माझं अभ्यासावर मन लागत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला घराबाहेर अनेक लोकांसमोर ओरडून मारहाण केली होती. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. एवढंच नाही तर घरातही मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. घरामध्ये माझी आई आणि बहिण मला सपोर्ट करत नव्हती. याचदरम्यान, माझे वडील सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार असल्याचं मला कळलं. त्यामुळे नाराज होऊन मी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आरोपी अर्जुन याने बुधवारी सकाळी घरात ठेवलेला चाकू उचलला आणि तिघांचीही गळा कापून हत्या केली. या हत्याकांडामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं असलेलं कुटुंब आता त्यांच्यामध्ये नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नाही आहे. 

बुधवारी दिल्लीतील नेबसरायमधील देबली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांची ओळख राजेश कुमार, कोमल आणि मुलगी कविता अशी पटली होती.   मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड दिल्लीतील नेब सराय परिसरात झालेल्या ट्रिपल मर्डरमुळे खळबळ उडाली होती. या हत्याकांडात कुटुंबातील आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मुलगा बचावला होता. मात्र आता या मुलानेच त्याचे आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे तिहेरी हत्याकांड समोर आल्यानंतर बचावलेल्या मुलाने सांगितले होते की, मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. त्यादरम्यान, कुणीतरी घरात घुसून कुटुंबीयांची हत्या केली. मात्र पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले तेव्हा घरात कुणीच घुसलं नसल्याचं समोर आलं. त्याशिवाय घराच्या मेन गेटला लागलेलं कुलूप कुणी तोडलं नसल्याचं तसेच त्या कुलुपासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली नव्हती, अशी माहिती तपासामधून समोर आली. त्यानंतर पोलिसांना या हत्याकांडात बचावलेला मुलगा अर्जुन याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी अर्जुन याने पोलिस चौकशीमध्ये सांगितले की, माझे वडील अभ्यासावरून रागवायचे. मात्र माझं अभ्यासावर मन लागत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला घराबाहेर अनेक लोकांसमोर ओरडून मारहाण केली होती. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. एवढंच नाही तर घरातही मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. घरामध्ये माझी आई आणि बहिण मला सपोर्ट करत नव्हती. याचदरम्यान, माझे वडील सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार असल्याचं मला कळलं. त्यामुळे नाराज होऊन मी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपी अर्जुन याने बुधवारी सकाळी घरात ठेवलेला चाकू उचलला आणि तिघांचीही गळा कापून हत्या केली. या हत्याकांडामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हसतं खेळतं असलेलं कुटुंब आता त्यांच्यामध्ये नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नाही आहे. बुधवारी दिल्लीतील नेबसरायमधील देबली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांची ओळख राजेश कुमार, कोमल आणि मुलगी कविता अशी पटली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीFamilyपरिवार