शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:03 IST

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीला अहवाल सोपविला होता, महाकुंभमधील संगमावरच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया सापडल्याचे यात म्हटले होते. यामुळे हे पाणी अंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी लायक नसल्याचे म्हटले होते. या गंगाजलाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी गंगाजलाचे परीक्षण केले आहे. यामध्ये गंगाजल अंघोळ करण्यासच योग्य नाही तर अल्कलाईन पाण्याएवढे शुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ५७ कोटी लोक अंघोळ करून गेले तरी या पाण्याच्या शुद्धतेत काही फरक पडला नसल्याचे ते म्हणाले आहेत. सोनकर यांनी त्यांच्या नैनी येथील लॅबमध्ये हे परीक्षण केले आहे. या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत येऊन टेस्टिंग करण्याचे आव्हानही दिले आहे. 

तीन महिन्यांच्या सतत संशोधनातून गंगेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. येथे आंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. बॅक्टेरियोफेज (जीवाणू खाणारा) असल्यामुळे गंगेच्या पाण्याची शुद्धता अबाधित राहते, असा दावा त्यांनी केला आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत १४ तास ठराविक तापमानावर ठेवल्यानंतरही त्यात विषाणूंची वाढ झालेली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठी सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत, असे ते म्हणाले. 

कोट्यवधी भाविकांनी स्नान केले असूनही, पाण्यात बॅक्टेरियाची वाढ झाली नाही किंवा पाण्याच्या पीएच पातळीत कोणतीही घट झाली नाही, असे यात दिसले आहे. गंगेच्या पाण्यात ११०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज असतात. जे कोणत्याही हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. यामुळे हे पाणी प्रदुषित झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गंगेच्या पाण्याची आम्लता (पीएच) सामान्यपेक्षा चांगली होती आणि त्यात कोणताही दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाची वाढ आढळली नाही. पीएच पातळी देखील ८.४ ते ८.६ दरम्यान आढळून आल्याचे ते म्हणाले. 

सोनकर हे प्रयागराजच्या नैनीचे राहणारे आहेत. कृत्रिमरित्या मोती वाढवून त्यांनी मोठी क्रांती केली होती. यामुळे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. 

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजwater pollutionजल प्रदूषण