शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:03 IST

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीला अहवाल सोपविला होता, महाकुंभमधील संगमावरच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया सापडल्याचे यात म्हटले होते. यामुळे हे पाणी अंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी लायक नसल्याचे म्हटले होते. या गंगाजलाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी गंगाजलाचे परीक्षण केले आहे. यामध्ये गंगाजल अंघोळ करण्यासच योग्य नाही तर अल्कलाईन पाण्याएवढे शुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ५७ कोटी लोक अंघोळ करून गेले तरी या पाण्याच्या शुद्धतेत काही फरक पडला नसल्याचे ते म्हणाले आहेत. सोनकर यांनी त्यांच्या नैनी येथील लॅबमध्ये हे परीक्षण केले आहे. या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत येऊन टेस्टिंग करण्याचे आव्हानही दिले आहे. 

तीन महिन्यांच्या सतत संशोधनातून गंगेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. येथे आंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. बॅक्टेरियोफेज (जीवाणू खाणारा) असल्यामुळे गंगेच्या पाण्याची शुद्धता अबाधित राहते, असा दावा त्यांनी केला आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत १४ तास ठराविक तापमानावर ठेवल्यानंतरही त्यात विषाणूंची वाढ झालेली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठी सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत, असे ते म्हणाले. 

कोट्यवधी भाविकांनी स्नान केले असूनही, पाण्यात बॅक्टेरियाची वाढ झाली नाही किंवा पाण्याच्या पीएच पातळीत कोणतीही घट झाली नाही, असे यात दिसले आहे. गंगेच्या पाण्यात ११०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज असतात. जे कोणत्याही हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. यामुळे हे पाणी प्रदुषित झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गंगेच्या पाण्याची आम्लता (पीएच) सामान्यपेक्षा चांगली होती आणि त्यात कोणताही दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाची वाढ आढळली नाही. पीएच पातळी देखील ८.४ ते ८.६ दरम्यान आढळून आल्याचे ते म्हणाले. 

सोनकर हे प्रयागराजच्या नैनीचे राहणारे आहेत. कृत्रिमरित्या मोती वाढवून त्यांनी मोठी क्रांती केली होती. यामुळे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. 

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजwater pollutionजल प्रदूषण