शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

रेल्वे स्थानकाची गोष्टच न्यारी, एकाचवेळी दोन जिल्ह्यात थांबते झूक झूक रेलगाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 2:23 PM

उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील हे रेल्वे स्टेशन असून स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर तिचा अर्धा भाग एका जिल्ह्यात आणि दुसरा अर्धा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

देशाला जोडणारी, देशाची लाईफलाईन म्हणजे भारतीय रेल्वे. अगदी ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत या रेल्वेचं जाळ पसरलं आहे. कमी भाडे आकारणी करत दूरदूरवर पोहोचवणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचं महत्त्व आणि खासियत अगणीत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाला एक त्या त्या गावचं किंवा तेथील लोकांच्या भावनांचं एक विशेष महत्त्व आहे. तसेच, अनेक ठिकाणची रेल्वे स्थानकं ही ऐतिहासिक वारसा ठरली आहेत. उत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्थानकाची कथा निराळीच आहे. कारण, या रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म दोन जिल्ह्यात येतो.

उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यातील हे रेल्वे स्टेशन असून स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर तिचा अर्धा भाग एका जिल्ह्यात आणि दुसरा अर्धा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो. देशातील हे तिसरं रेल्वे स्टेशन आहे, ज्याची गोष्ट अशी रंजक आहे. दिल्ली-हावडा रेल्वे रूट जे कानपूर देहात आणि औरेया या दोन जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील कंचौसी हे रेल्वे स्टेशन दोन जिल्ह्याच्या सीमांमध्ये आहे. त्यामुळेच, येथे थांबणारी रेल्वे गाडी अर्धी कानपूर देहात तर अर्धी औरेया जिल्ह्यात उभी असते. या रेल्वे स्टेशनचं ऑफिस कानपूर देहात जिल्ह्यात असून प्लटॅफॉर्मचे शेटवटचे टोक औरेया जिल्ह्यातील सीमांत येते. 

काही दिवसांपूर्वी या स्थानकावर केवळ पॅसेंजर ट्रेन येत असत. मात्र, नुकतेच मालदा टाऊन येथून दिल्लीला जाणारी फरक्का एक्सप्रेस 6 महिन्यांच्या ट्रायल बेसीसवर येथे थांबा घेत आहे. या ट्रेनला येथे थांबा मिळाल्याने नागरिकांची, प्रवाशांची चांगली सोय होत असल्याचं येथील स्थानिकाचं म्हणणं आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेkanpur-urban-pcकानपूर शहरीUttar Pradeshउत्तर प्रदेश