शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:30 IST

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत."

नवी दिल्ली / इम्फाळ : मणिपूरमध्ये “अनिश्चितता आणि भीती” मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार तेथील “अत्यंत गंभीर” परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी आघाडीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर केला. येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी‘इंडिया’  आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी केंद्र सरकारच्या ‘मौना’बद्दल टीका केली. तसेच, ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल सरकार उदासीनता दर्शवित असल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना दिलेल्या निवदेनात काय?मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत सतत गोळीबारामुळे हे निःसंशयपणे सिद्ध होते की राज्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनेटवरील बंदीमुळे अफवा पसरल्या जात आहेत. सर्व समुदायांमध्ये संताप आणि परकेपणाची भावना आहे आणि विलंब न करता त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

८९ दिवसांपासून  मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून ती माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे शिष्टमंडळाने म्हटले. १४० हून अधिक मृत्यू मणिपूरमध्ये आतापर्यंत झाले आहेत.५००० घरे जाळली गेली आहेत. ६० हजार लोक विस्थापित झाली आहेत.

शिष्टमंडळात काेण?या शिष्टमंडळात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई,  सुष्मिता देव, महुआ माझी, कनिमोळी, मोहम्मद फैजल, जयंत चौधरी, मनोज कुमार झा, एन. के. प्रेमचंद्रन, टी. तिरुमावलावन, डी. रविकुमार यांच्याशिवाय राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि अनिल प्रसाद हेगडे, संदोश कुमार, ए. ए. रहीम, सपाचे जावेद अली खान, आययूएमएलचे ई. टी. मोहम्मद बशीर, आपचे सुशील गुप्ता आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार