शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:30 IST

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत."

नवी दिल्ली / इम्फाळ : मणिपूरमध्ये “अनिश्चितता आणि भीती” मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार तेथील “अत्यंत गंभीर” परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी आघाडीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर केला. येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.

सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी‘इंडिया’  आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी केंद्र सरकारच्या ‘मौना’बद्दल टीका केली. तसेच, ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल सरकार उदासीनता दर्शवित असल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना दिलेल्या निवदेनात काय?मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत सतत गोळीबारामुळे हे निःसंशयपणे सिद्ध होते की राज्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनेटवरील बंदीमुळे अफवा पसरल्या जात आहेत. सर्व समुदायांमध्ये संताप आणि परकेपणाची भावना आहे आणि विलंब न करता त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

८९ दिवसांपासून  मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून ती माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे शिष्टमंडळाने म्हटले. १४० हून अधिक मृत्यू मणिपूरमध्ये आतापर्यंत झाले आहेत.५००० घरे जाळली गेली आहेत. ६० हजार लोक विस्थापित झाली आहेत.

शिष्टमंडळात काेण?या शिष्टमंडळात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई,  सुष्मिता देव, महुआ माझी, कनिमोळी, मोहम्मद फैजल, जयंत चौधरी, मनोज कुमार झा, एन. के. प्रेमचंद्रन, टी. तिरुमावलावन, डी. रविकुमार यांच्याशिवाय राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि अनिल प्रसाद हेगडे, संदोश कुमार, ए. ए. रहीम, सपाचे जावेद अली खान, आययूएमएलचे ई. टी. मोहम्मद बशीर, आपचे सुशील गुप्ता आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार