शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:36 IST

केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. त्यातच, केरळकाँग्रेसने काश्मीर पंडितांच्या जम्मू काश्मीरमधील पलायनासदर्भात अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा खोटा ठरवला आहे. 

केरळकाँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळ काँग्रेसने कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले होते. ''ज्यानी कश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ते दहशतवादी होते. सन 1990 ते 2007 या कालावधीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली आहे. तर, या 17 वर्षांच्या कालावधीत 15 हजार मुसलमांनाची दहशतवाद्यांनी हत्या केली.'', असे केरळ काँग्रसने म्हटले आहे. तसेच, काश्मिरी पंडिताचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसार झाले होते, जे स्वत: आरएसएसचे होते.  भाजपने समर्थन केलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारवेळी पंडितांचे पलायन झाले होते. भाजपच्या समर्थनातून व्ही.पी.सिंग यांचे सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेत आले होते. त्यानंतर, बरोबर 1 महिन्यांनी पंडितांचे पलायन सुरू झाले होते. भाजपने यावर काहीही केले नाही, याउलट नोव्हेबर 1990 पर्यंत व्ही.पी. सिंग सरकारला आपलं सर्मथन दिलं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने काश्मीरमध्ये पंडितांसाठी 5242 घरं बनवली. पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केली. त्यामध्ये, पंडितांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश होता, असा दावाही काँग्रेसने केला.  दरम्यान, काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन ते ट्विट डिलिट केलं आहे. या ट्विटचा वेगळाच अर्थ काढण्यात आला. भाजपचे जातीय अपप्रचाराचा मुद्दा बनवल्याने कालच्या ट्विटमधील काही भाग आम्ही काढला असून वस्तूनिष्ठतेवर आजही आम्ही कायम आहोत, असे केरळ काँग्रसेने आज ट्विट करुन म्हटलं आहे.    

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया