शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:36 IST

केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. त्यातच, केरळकाँग्रेसने काश्मीर पंडितांच्या जम्मू काश्मीरमधील पलायनासदर्भात अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा खोटा ठरवला आहे. 

केरळकाँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळ काँग्रेसने कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले होते. ''ज्यानी कश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ते दहशतवादी होते. सन 1990 ते 2007 या कालावधीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली आहे. तर, या 17 वर्षांच्या कालावधीत 15 हजार मुसलमांनाची दहशतवाद्यांनी हत्या केली.'', असे केरळ काँग्रसने म्हटले आहे. तसेच, काश्मिरी पंडिताचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसार झाले होते, जे स्वत: आरएसएसचे होते.  भाजपने समर्थन केलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारवेळी पंडितांचे पलायन झाले होते. भाजपच्या समर्थनातून व्ही.पी.सिंग यांचे सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेत आले होते. त्यानंतर, बरोबर 1 महिन्यांनी पंडितांचे पलायन सुरू झाले होते. भाजपने यावर काहीही केले नाही, याउलट नोव्हेबर 1990 पर्यंत व्ही.पी. सिंग सरकारला आपलं सर्मथन दिलं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने काश्मीरमध्ये पंडितांसाठी 5242 घरं बनवली. पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केली. त्यामध्ये, पंडितांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश होता, असा दावाही काँग्रेसने केला.  दरम्यान, काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन ते ट्विट डिलिट केलं आहे. या ट्विटचा वेगळाच अर्थ काढण्यात आला. भाजपचे जातीय अपप्रचाराचा मुद्दा बनवल्याने कालच्या ट्विटमधील काही भाग आम्ही काढला असून वस्तूनिष्ठतेवर आजही आम्ही कायम आहोत, असे केरळ काँग्रसेने आज ट्विट करुन म्हटलं आहे.    

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया