शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार भरपाई देऊन दानधर्म करीत नाही; सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 05:48 IST

कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र असमाधानकारक आहे, असे स्पष्ट करत राजस्थान सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र असमाधानकारक आहे, असे स्पष्ट करत राजस्थान सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राजस्थान सरकार भरपाई देऊन काही दानधर्म करीत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. 

न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. “राजस्थान सरकारने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र अजिबात समाधानकारक नाही. सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वकील वेळ मागतात,” असे म्हणत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

अधिवक्ता गौरव कुमार बन्सल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात म्हटले की, राजस्थान २०२१ च्या आदेशाचे पालन करत नाही. त्याद्वारे राज्यांना  कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.