शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 10:36 IST

कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भुवनेश्वर - "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती", ही म्हण एक बाप-लेकीला अगदी फीट बसते. हे लोक शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होते. खरे तर, ही नशिबाचीच कमाल म्हणावी लागेल की, एम के देब आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी स्वाती यांनी प्रवासादरम्यान आपल्या सीटची अदलाबदल केली. यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी मृत्यूला मात दिली. कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

खरे तर एम के देब आणि त्यांची मुलगी खडगपूर येथून ट्रेनमध्ये बसले होते आणि त्यांना कटकमध्ये उतरायचे होते. कारण शनिवारी त्याची एका डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचे तिकीट होती. मात्र मुलीने खिडकीत बसण्याचा आग्रह केला होता. देब म्हणाले, आमच्याकडे विंडो सीट तिकीट नव्हते. त्यामुळे आम्ही टीसीला विनंती केली. यावर, जर शक्य असेल तर ते इतर प्रवाशांसोबत आपले तिकीट अदलाबदल करू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर आम्ही दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि दोन जणांना विनंती केली. ते राजी झाले. यानंतर ते आमच्या मुख्य कोचमध्ये गेले आणि आम्ही त्यांच्या कोचमध्ये आलो. जे आमच्या सीटपासून तीन कोट दूर होते. 

सुदैवाने बचावले -या दोघांनी सीट बदलल्यानंतर काही वेळाने भयंकर ट्रेन अपघात झाला. या अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ज्या कोचमधून या बाप-लेकीची जोडी प्रवास करत होती त्या कोचचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र ज्या कोचमध्येचे त्यांचे तिकीट होते, त्या कोचचे प्रचंड नुकसान जाले. यातील अनेकांचा मृत्यू झाला.

'चमत्कारासाठी देवाचे आभार' -देब म्हणाले, आमच्यासोबत जागा बदलण्यास तयार झालेल्या दोन प्रवाशांच्या स्थितीसंदर्भात आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, या चमत्कारासाठी देवाचे आभारी आहोत. आमच्या डब्यातील जवळपास सर्वच प्रवासी सुखरूप होते.

देब म्हणाले, किरकोळ जखमी झालेले लोक आणि आपली मुलगी स्थानिक लोकांच्या मदतीने शनिवारी सकाळच्या सुमारास कटक येथे पोहोचलो. मुलीच्या डाव्या हाताला फोट आला आहे. तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. यावेळी, बाल रोग तज्ज्ञ विक्रम सामल म्हणाले, जेव्हा मला हे दोघे अगदी चमत्कारिकपणे बचावल्याचे समजले, तेव्हा माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नव्हते. अपघातानंतर, कोचमध्ये पडूनही त्यांना किरकोश मार लागला आहे.

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू