शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 10:36 IST

कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भुवनेश्वर - "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती", ही म्हण एक बाप-लेकीला अगदी फीट बसते. हे लोक शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होते. खरे तर, ही नशिबाचीच कमाल म्हणावी लागेल की, एम के देब आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी स्वाती यांनी प्रवासादरम्यान आपल्या सीटची अदलाबदल केली. यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी मृत्यूला मात दिली. कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

खरे तर एम के देब आणि त्यांची मुलगी खडगपूर येथून ट्रेनमध्ये बसले होते आणि त्यांना कटकमध्ये उतरायचे होते. कारण शनिवारी त्याची एका डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचे तिकीट होती. मात्र मुलीने खिडकीत बसण्याचा आग्रह केला होता. देब म्हणाले, आमच्याकडे विंडो सीट तिकीट नव्हते. त्यामुळे आम्ही टीसीला विनंती केली. यावर, जर शक्य असेल तर ते इतर प्रवाशांसोबत आपले तिकीट अदलाबदल करू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर आम्ही दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि दोन जणांना विनंती केली. ते राजी झाले. यानंतर ते आमच्या मुख्य कोचमध्ये गेले आणि आम्ही त्यांच्या कोचमध्ये आलो. जे आमच्या सीटपासून तीन कोट दूर होते. 

सुदैवाने बचावले -या दोघांनी सीट बदलल्यानंतर काही वेळाने भयंकर ट्रेन अपघात झाला. या अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ज्या कोचमधून या बाप-लेकीची जोडी प्रवास करत होती त्या कोचचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र ज्या कोचमध्येचे त्यांचे तिकीट होते, त्या कोचचे प्रचंड नुकसान जाले. यातील अनेकांचा मृत्यू झाला.

'चमत्कारासाठी देवाचे आभार' -देब म्हणाले, आमच्यासोबत जागा बदलण्यास तयार झालेल्या दोन प्रवाशांच्या स्थितीसंदर्भात आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, या चमत्कारासाठी देवाचे आभारी आहोत. आमच्या डब्यातील जवळपास सर्वच प्रवासी सुखरूप होते.

देब म्हणाले, किरकोळ जखमी झालेले लोक आणि आपली मुलगी स्थानिक लोकांच्या मदतीने शनिवारी सकाळच्या सुमारास कटक येथे पोहोचलो. मुलीच्या डाव्या हाताला फोट आला आहे. तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. यावेळी, बाल रोग तज्ज्ञ विक्रम सामल म्हणाले, जेव्हा मला हे दोघे अगदी चमत्कारिकपणे बचावल्याचे समजले, तेव्हा माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नव्हते. अपघातानंतर, कोचमध्ये पडूनही त्यांना किरकोश मार लागला आहे.

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू