शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"कोकीळ अन् कावळा एकाच रंगाचे पण...", संस्कृत सुभाषितानं युक्तिवादाचा शेवट; कामत म्हणाले, खरी शिवसेना कोण ते...

By मोरेश्वर येरम | Updated: March 16, 2023 17:32 IST

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली-

सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून खंडपीठानं निकाल राखून ठेवला आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या राजकीय महानाट्यात अखेर कुणाच्या बाजूनं निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू खंडपीठासमोर मांडताना जोरदार आणि सडेतोड युक्तिवाद केला आहे. 

न्यायालयानं आज ठाकरे गटाच्या वकिलांना रिजॉइंडरसाठी वेळ दिला होता. यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांना याआधीच्या युक्तिवादात राहून गेलेले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादानं याचिकेची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कामत यांनी संस्कृत सुभाषिताचा दाखला देत आपला युक्तिवाद पूर्ण केला. 

'...तर शिवसेना पक्षाचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिलही स्तब्ध

"कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो. पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं...कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो. इथे शिवसेना कोण? खरी शिवसेना कोण हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईल", असं देवदत्त कामत म्हणाले आणि त्यांनी आपला युक्तिवाद संपल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. 

“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

दोन्ही पक्षकारांना पुरेसा वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज सर्वांचं अभिनंदन केलं. तसंच कोर्टरुममधील ज्युनिअर सहकारांचंही अभिनंदन केलं आणि सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. कोर्टानं याप्रकरणाचा निकाल आता राखून ठेवला आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 

"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

देवदत्त कामत यांनी यावेळी एक महत्वाची गोष्ट खंडपीठाला लक्षात आणून दिली. पक्षात फूट पडल्याचा दावा आम्ही केलेला नाही असं वारंवार शिंदे गटाच्या वकिलांकडून म्हटलं जात आहे. पण निवडणूक आयोगानं दिलेला निकाल एकदा वाचा त्यांनी पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचा उल्लेख करत निकाल दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याचा पुरावा असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यांच्या लेखी निवेदनात फूट पडल्याचं नमूद आहे, असं कामत म्हणाले.

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

राजकीय पक्ष ही काही अनिश्चित संकल्पना नाही. राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारे अनेक गट असू शकतात. पण २१ जूनला एकच पक्ष होता ज्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते, असंही देवदत्त कामत म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय